Vedic Religion is foreign to India
- Get link
- X
- Other Apps
Showing posts with label हिंदु धर्म. Show all posts
Tuesday, January 21, 2020
Vedic Religion is foreign to India
By Dr. Sanjeev Sabhlok
The Vedic religion is all about fire worship. So what is the link (if any) between Vedas and Shiva and Ganesha – which have everything to do with fertility worship.
I’ve taken some material sent by Sanjay Sonawani and reviewed against well-referenced standards. These are my initial findings (many words continue to be that of Sanjay)
INDUS VALLEY CIVILISATION DEFINITELY KNEW ABOUT THE ELEPHANT
The oldest elephant-type image in India so far was found at Harappa. (approx. 2600 BC). This is the image from Harappa.com, a reputed website.
This is extremely tiny: Approximate dimensions (W x H(L) x D): 5.4 x 4.8 x 4.6 cm. It is difficult to made deductions from this. However, it has some traces of vermillion. Further, it does look close enough to a modern Ganesha.
Elephant bones have also been found (see this )
SHIVA WAS DEFINITELY PART OF THE INDUS VALLEY BELIEF SYSTEM
A “proto-Shiva” was found in the Indus Valley:
A Shiva lingam has been found at Kalibangan site, dating back to 2600 BC.
RIG VEDA DID NOT DISPLAY CONCLUSIVE KNOWLEDGE OF THE ELEPHANT
The word “Gana” in Rig veda appears as individual abstract deities, most probably Maruts,
“Ganapati” in Rigveda is used as an epithet of Brahmanaspati and verses themselves are clear that they were used to invoke abstract god who had nothing to do with elephant head god.
Vedic people might have heard about elephants but the verses show that they had no physical knowledge of elephants. The terms used for Elephants also are too ambiguous and this is why the commentators on Rig veda are not sure what actually Vedic people meant. No direct reference to “Hastin” is found in the Rigveda. (Note this Wikipedia article: https://en.wikipedia.org/wiki/Hastin#The_elephant_in_the_Rigveda )
The verses in Rigveda nowhere show the connection of Indra with elephant, even if considered that the Vedic clans knew elephant. In the later centuries, when Indra was depicted as lord of the heaven, he got a vehicle “Airavat”, a heavenly elephant. Rigvedic verses nowhere mention of existence of any Airavat or for that matter any vehicle of Indra.
DIDN’T VEDAS INVOKE GANESHA?
Allegedly, “Rig Veda begins with the invocation of Lord Ganesha, who is described as the Chief of Ganas (divine beings) and as the Supreme Seer (Rig Veda 2.23).” [Source]
But Sanjay Sonawani has clarified that “Vedic literature does not start with salutation to Ganesha. Interpolated fabricated literature has added him, including an inserted version in Mahabharata that depicts Ganesha as a writer of poet Vyasa. Rather, Mahabharata’s beginning lines salute Narayana and Sarasvati.
RUDRA AND SHIVA ARE NOT THE SAME
Rudra and Shiva are today considered one and the same but this is not true. Sanjay Sonawani provides the following information from Vedas as proof:
From the religious history of Hinduism, we can easily note that both the Gods are different and each representing the opposite religious traditions i.e. Vedic and Non-Vedic.
Shiva is the highly worshipped Indian deity, with millions of temples across the country. Not a single town or village is to be found where a Shiva shrine is absent. Shiva is worshipped either in the temples or in the open in his Lingam (Phallic) form. His consort Shakti (synonyms Parvati, Jagdamba, Amba etc.) are also worshiped in unified form with Shiva and also independently in abundant temples dedicated to Shakti across the country. Shiva-Shakti worship can be traced back to the Indus civilization where abundant proofs of Shiva worship have been found. All non-Vedic elements can be seen in Shiva images such as serpent in the neck, wearing tiger skin, residing in the hills and cemeteries, driving bull, being hunter etc.
Shiva has no space in the Vedic religion. Rather He is ridiculed as “Phallus God” (Shisnadeva) in the Rig Veda.
Rudra is an independent God of Rig Veda among other Vedas. The following information on Rudra is found in the Rig Veda and related texts.
- There are only three verses dedicated to Rudra in Rig Veda. In a way Rudra was a minor god of the Vedic people.
- Main epithet of Rudra is “Agni” (Fire).
- In Agnichayana (a kind of fire sacrifice) to keep the fire kindled, butter is constantly poured in the fire pit, while chanting “Shatarudriya”(Hymns addressed to Rudra) requesting him to immerse in the fire.
- Taittiriya Samhitastates state that a sacrifice conducted in favor of Rudra enriches the host (person making the sacrifice) like Indra.
- Vedic Rudra is as handsome as the supreme Vedic God Indra, having golden complexion. He wears golden necklace and holds golden axe. He helps Vedic people in finding lost cattle.
- In Rig Vedic descriptions Rudra is said to be older than oldest.
- Rudra’s father is Prajapati.(Maitrayani Sanhita,6:1-9). In a mythical story Rudra is said to have killed his father, Prajapati.
- Rudra is depicted as a destroyer of humankind and animals in Rig Veda. (RV 2.33.10)
- Rudra is not a single entity but is enumerated from 11 to 60 in different texts of Vedic literature. In this way, Rudra represents a group of deities bearing the same name. He also is often called the father of Maruts, another group of Vedic Gods.
- Rudrasavarni, 12thManu, is said to be the son of the Rudra.
- Dogs and Wolves are the pets of Rudra. (Atharva Veda 11.2.2)
This description of the Vedic Rudra dose not match with Shiva.
Shiva was and is a supreme God for the Non-Vedic people. Shiva is ajanma, having no birth or father. Indeed, Shiva is a concept of creation, preservation and destruction of the universe that is worshiped in phallic form. He has no son directly born to him, though kartikeya and Ganesha are associated with him as his sons in later times. Shiva’s mythical abode is mount Kailasa. None of the mythologies associated with him match with Rudra’s. Rather Shiva is called “Smarari”, destroyer of the fire sacrifices, while all Vedic rituals dedicated to Rudra are associated with fire sacrifices.
In fact, this point about the alleged “Shiva” of Vedas being quite different from the actual Shiva is made clear inadvertently by Doris Srinivasan in his “Unhinging Siva from the Indus Civilization”, The Journal of the Royal Asiatic Society of Great Britain and Ireland, No. 1 (1984), pp. 77-89
It is critical to observe that the animals depicted on the seal are all wild animals, being the elephant, tiger, buffalo and rhinoceros. In surveying the term pagupati in the Rig Veda and Atharva Veda, especially as it relates to Rudra, it is to be concluded that a pagupati does not protect wild animals. Verses in the Atharva Veda make it quite clear that a pagupati protects the domestic animals upon which the agrarian economy and ritual depend. The Vedic evidence would therefore not support the interpretation that the animals on seal 420 are within the domain of a Pasupati. Indeed there is further textual evidence in the Rig Veda and Atharva Veda that Rudra injures precisely those creatures under the protection of a Paiupati.
Srinivsan thinks that Shiva originated in the Vedas and since the seal doesn’t match the Vedic description, it can’t be the Shiva. But the fact is that Shiva originated in traditional Hinduism, including Indus Valley civilisation, and that Shiva is TOTALLY different to Pasupati of the Vedas.
EVOLUTION OF THE IDEA OF GANESHA
Gana in Indian culture always refers to the clans and Ganapati as clan head. Different clans used totems such as serpents, reptiles, birds, trees and elephants. Later when various tribes/clans did assimilitate, those totemic symbols were merged in single symbol.
Ganesha’s other epithet is “Vratapati”, lord of the Vratyas – which were non-vedic communities.
The iconology of Ganesha has evolved with time. We have couple of human-head Ganesha from Kushan era. The Ganesha we see today is a collective product of Naga, Yaksha, Vratya and Shiva culture.
GANESHA WAS THE ENEMY OF FIRE SACRIFICE
In the beginning Ganesha (aka Vinayak) was an enemy of fire sacrifices, causing obstruction to such sacrifices. Hence the first oblation was given to him asking him to go to the distant Mujavat mountain. Thus, Ganesha was considered a trouble-maker by the Vedics but was later was accepted as the destroyer of troubles.
WHAT ABOUT MAHAMRITUNJAYA MANTRA?
“Mahamritunjay mantra is mentioned in Rigveda” – said someone. I had no clue about this mantra. I’m informed by Sanjay that mahamrityunjay verse is addressed to “Tryanbak” (an epithet of the fire).
The meanings of Tryanbak is “one who has three fathers in Vedic sense. This term was applied to Shiva also as “one who has three eyes”. But these are entirely different concepts – Mhmrityunjay Mantra has nothing to do with Shiva.
In this regard, “Om” is absent throughout Vedas and other Vedic literature. Om is used mostly for Shiva and the gods in his pantheon. Om in mahamrityunjay mantra also is not found in the original text. The Original Rigvedic mantra simply starts with “Tryambakam yajamahe”. Om was inserted later to show affinity with Shiva.
WHAT ABOUT Yajurveda 4.5.8.1?
This verse states: “Hail to Shiva the most auspicious one, hail to Soma Rudra, hail to the red, copper hued one, hail to the terrible and fearful one, hail to the blue necked one, hail to Pashupati, hail to Shambhu, hail to Shankara, hail to Kapardin, the one with matted hair”- Yajurveda 4.5.8.1 [Source]
Sanjay’s response which I agree with – because he has a concrete theory that explains all facts, while the others don’t:
These verses are from Krishna Yajurveda’s Taaittiriya Samhita, which was used in the southern region only and might have originated there probably during the 1st century BC to third century A.D. – a far later composition (couldn’t be earlier than this as claimed and even if considered older, it is composed in India when Vedics were settled and had started spreading their religion with missionary practice). This mantra also appears without the initial Om in the eighth hymn.
This may be during the period of Vedic missionary entered south India and had to show semblance with Hindu popular gods.
Though Vedics tried to assimilate Shiva with Rudra, Shiva to Hindu remains as only Shiva. Rudra is not worshipped in Lingam form. [Sanjeev: This is the most crucial proof as far as I’m concerned]
These lines also appear in Vajasneyi Samhita of Shukla Yajurveda. This verse is part of Shatarudriya, a hymn in praise of Rudra in which this one line appears which mentions Shiva. But the entire Rudriya does not show that it is meant for Shiva. In fact, Shiva is used as an epithet to Rudra and some special attributes of Shiva have been used for Rudra. This does not make both one and the same.
Vedics created this verse out of their need to adapt to a foreign land. Thus, Christians in the medieval period wrote their own “Khrist Purana” in Indian Purana style to spread their message. Such a strategy seems to have been initiated by the Vedics – who inserted the mention of Shiva in a couple of places in late writings in order to “prove” that the Hindu Shiva is also Vedic – which he is obviously not.
WHAT ABOUT DURGA PARVATI AND THE MOTHER GODDESS CONCEPT?
Since Parvati, Durga and so on are crucial to the fertility focus of traditional Hinduism, to what extent do such goddesses find mention in the Vedas?
Since Parvati, Durga and so on are crucial to the fertility focus of traditional Hinduism, to what extent do such goddesses find mention in the Vedas?
Fertility is not part of Vedicism. The concept of “Mother Goddess” is absent in Vedic literature. Indologist Dr. RG Bhandarkar also states that the concept of the mother goddess is significant as it is more or less absent in the Vedas. Similarly, image worship which is so basic to the present day Hinduism was unknown in the Vedic and post Vedic periods, whereas there are indications that it was practiced by the people of Sindhu valley civilisation and so on.
The process and social ideology of both religions (Hinduism and Vedic religion) are completely opposite to each other which is reflected in their iconology and mythology.
Female goddesses are very few in the Vedas in comparison with about 640 male gods. Most female goddesses are the personification of natural elements such:
- Sarasvati (River)
- Ratri (Night)
- Dhatri (Earth)
- Ushas (the personification of the morning)
They are subordinate goddesses because the Vedic system is patriarchal and women are treated inferior to men. No Vedic goddess is prominent even today although the Vedics have tried to promote Sarasvati.
For instance, the consort of Vishnu, Laxmi is not originally a Vedic goddess nor does she finds any mention in the main body of Rigveda. Laxmi originally was worshipped in India in the Yakshini form and was associated with Vishnu in the Gupta era. But if we look and the iconology, Laxmi is not depicted as Mother Goddess and is subordinate to Vishnu serving him sitting at his feet whereas Shiva-Shakti is equal and unified in the form of Shivalingam and his Ardha-Nari Nateshvar form. Hindus give equal importance (and at some places even higher) to Shakti goddesses. That is why if there are 12 Jyotirlingas there are 52 main Shaktipeethas spread across the country.
MY NOTE REGARDING THE IMPLICATIONS OF SANJAY’S WORK
Once Vedic religion is proved to be distinct (and foreign) to Hinduism, it will have many political implications:
a) It will destroy RSS/BJP’s claim that Vedic Hinduism is indigenous. Since Vedic religion is foreign, their objections to Islam and Christianity become less valid.
b) It will destroy the concept of “varna”-based caste system. Vedics can continue with their caste if they wish. But most Hindus can then choose to abandon this nonsense and revert to their ancient tradition of total equality.
AND
c) It will bring back a focus on India’s many sceptical schools of thought. It will liberate India from all forms of social, internal, tyranny and make it meaningful as a society to focus on freedom and good governance.
Courtesy- Sanjeev Sabhlok
Wednesday, December 25, 2019
मनुस्मृती कोणासाठी?
![MANUSMRITI (Hindi Edition) by [SHASTRI, TIKAKAR - DR. RAMCHANDRA VERMA]](https://images-eu.ssl-images-amazon.com/images/I/51mLx3ziFSL.jpg)
मनुस्मृती हा वैदिक धर्मशास्त्रावरील प्रमुख ग्रंथ आहे. स्मृत्यांची संख्या जवळपास शंभरावर असली तरी मनुस्मृतीचे माहात्म्य व प्रामाण्य सर्वात मोठे मानले जाते. वेदांच्या खालोखाल भारतीय हिंदुंचा हा अत्यंत पूज्य आणि प्रमाणभूत ग्रंथ असून तो आपल्या संस्कृतीचा, आचाराचा आणि व्यवहाराचा आधारस्तंभ ठरला आहे. भारताच्या ऐहिक व पारलौकीक जीवनाचे नियमन शतकानुशतके हा ग्रंथच करत आला आहे असेही मानण्याची पद्धत आहे. (भारतीय संस्कृतिकोश, खंड ६, पृ. ७३३). एकीकडे मनुस्मृतीबद्दल एवढा पूज्यभाव असतांना डा. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी काही ब्राह्मण सहका-यांची मदत घेत मनुस्मृतीचे दहन केले. त्यानंतर प्रतिवर्षी हा मनुस्मृती दहन कार्यक्रम धार्मिक कर्मकांडाप्रमाणे दरवर्षी साजरा होत असतो. मनुस्मृती ही विषमता, अस्पृष्यता आणि स्त्री-स्वातंत्र्याच्या विरोधात असल्याने स्त्रीया व शूद्रातिशूद्र यांना हिंदु धर्मात गुलामीचे अन्याय्य जीवन जगावे लागले, म्हणून समता आणायची त्यर मनुस्मृती जाळली पाहिजे, म्हणजेच तिच्यातील विषमतामुलक तत्वांना तिलांजली दिली पाहिजे, यासाठी ते प्रतीकात्मक दहन होते. अर्थात ही प्रतिकात्मकता नंतर अनुयायांच्या दृष्टीतून अदृष्य होत जात नंतर मनुस्मृती जाळण्याला एक कर्मकांडाचे स्वरुप आले.
पण येथे पडनारा प्रश्न म्हणजे एकाच स्मृतीच्या बाबतीत एवढ्या टोकाची मते का असावीत? मनूस्मृती समस्त हिंदुंची पुज्य आचारसंहिता आहे असे मत व्यक्त करतांना नेमका काय आधार घेतला गेला? मनुस्मुतीचे संपुर्ण परिशिलन केले असता दिसणारे वास्तव वेगळेच आहे. किंबहुना संजय क्षीरसागरांचा या स्मृतीची संपुर्ण चिकित्सा करण्याचा हा आज्वरचा पहिलाच प्रयत्न आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. खरे म्हणजे आजवर, मनुस्मृतीची प्रशंसा करणारे व तिचे दहन करणारे अशा उभय पक्षांनी मनुस्मृतीचा नीट अभ्यास न केल्याने व ती नेमकी कोणत्या धर्माच्या व्यावहारिक व पारलौकिक तत्वांचे दिग्दर्शन करते हे लक्षात न घेतल्याने हा गोंधळ झाला आहे हे संजय क्षीरसागरांचे प्रस्तूत पुस्तक वाचल्यावर वाचकांच्या लक्षात येईलच. खरे तर ही काही धर्मशास्त्राच्या अभ्यासकांसाठी भुषणास्पद बाब नव्हे. पण आपल्याकडे कोणत्याही बाबीच्या मुळाशी न जाताच मते देण्याची प्रथा आहे. असे मत देतांना आपण मुळ संहितेशी प्रतारणा करत आहोत याचेही भान त्यांना राहत नाही. खरे म्हणजे चिकित्सेचे हे काम खूप पुर्वीच व्हायला हवे होते, पण धर्माभिमानी आणि धर्मविरोधक यांनी मिळून आपापल्या भ्रमांतच राहने पसंत केल्याने मनुस्मृतीची वास्तव चिकित्सा झाली नाही. मी जानेवारी २०१६ मध्ये दै. पूण्यनगरीच्या रविवार पुरवणीत मनुस्मृतीविषयक दोन लेख लिहिले होते. संतप्त वाचकांचा येणारा पहिला प्रश्न असा असे कि, "बाबासाहेबांनी मग मनुस्मृती उगाचच जाळली का?" खरे म्हणजे हा प्रश्नच औद्धत्याचा आहे. वास्तव समजावून न घेता केलेली कोंणतीही कृती समाजाला योग्य दिशा देत नाही. उलट आजकाल "मनूवाद, मनुवादी" या संज्ञांचा एवढा विस्फोट झाला आहे कि काही राजकीय पक्षही त्यातून सुटलेले नाहीत. मनुवादाचे वास्तव काय आहे हे समजावून घेतले असते तर आजच्या अनेक सामाजिक समस्यांचे उत्तर तेंव्हाच सापदले असते. पण राजकीय म्हणा अथवा तत्काळ प्रसिद्धीलोलुपता म्हणा,
एकतर समजुनही सत्यदर्शन तरी केले गेले नाही अथवा घोषणांत रमत केवळ विरोध करत बसणे अनेकांनी पसंत केले. त्यामुळे मुख्य विषय बाजुला पदल्याचे आपल्या लक्षात येईल.
मनुस्मृतीबाबत बोलतांना ही समस्त हिंदू धर्मियांची आचारसंहिता होती असा समज दोन्ही पक्षांचा असतो. भारतीय संस्कृती कोशातुनही हेच मत अभिव्यक्त होते आणि नेमकी येथेच खरी समस्या सुरू होते. आता वेदांखालोखाल या स्मृतीचे प्रामाण्य आहे असेही विद्वानच म्हणतात. विद्वान नेमके येथेच जाळ्यात अडकायला सुरुवात होते.
वेद चार मानायची एक प्रथा आहे. इसपू दुसरे शतक ते इसचे दुसरे शतक या काळात किंवा याही नंतर मनुस्मृतीचे लेखन झाले असावे असेही मानले जाते. परंतू मनुस्मृती चार नव्हे तर फक्त तीनच वेद प्रमाण मानते. अथर्ववेदाला मनुस्मृतीच्या दृष्टीने काही स्थानच नाही. किंबहुना या चवथ्या वेदाचे स्थानच मनुस्मृतीने नाकारले आहे. म्हणजे अथर्ववेद मुलातील वैदिकांचा नव्हे याचे भान मनुस्मृतीकारांना होते काय? तसे असण्याची अधिक शक्यता आहे कारण मुलात अथर्ववेद हा यज्ञयाग करणा-यांसाठी नाहीच,. त्याची मुले शैवागमांत सापडतात हे एक वास्तव आहे. अथर्ववेदाची लोकप्रियता पाहून ऋग्वेदाचा काही भाग जोडत नंतरच्या काळात वैदिकांनी या वेदाचा "चवथा वेद" म्हणून स्विकार केला हे एक वास्तव आहे.
मनुस्मृती खुद्द त्या तीन वेदांचे प्रामाण्य तरी मानते काय, या प्रश्नाचे उत्तर स्पष्तपणे "नाही" असे आहे. कारण ऋग्वेदातील एक अत्यंत महत्वाचे युद्ध म्हणजे दाशराज्ञ युद्ध. या युद्धाचा महानायक होता तो पैजवन सुदास. या युद्धात सुदास हा वेद व यज्ञांचे विरोधक असलेल्या शत्रु-टोळ्यांशी लढला व जिंकलाही. वशिष्ठ हा त्याचा प्रमुख पुरोहित. आधीचा पुरोहित विश्वामित्राला काढून वशिष्ठाला नेमले म्हणून रागावलेला विश्वामित्र शत्रुपक्षाला जाऊन मिळाला असेही नंतरच्या वैदिक साहित्यात म्हटले गेलेले आहे. असे असतांना या वैदिक धर्माची पताका उंचावणा-या सुदासाची अवनती केवळ ब्राह्मणांचा कोप झाल्याने झाली असे मनुस्मृती सांगते. मुळात कोणत्याही वेदात या कथेला कसलाही आधारच नाही. किंबहुना वेदात वर्णव्यवस्थाही नाही. मग वेदप्रामाण्य या संज्ञेला काय आधार राहतो? एक प्रकारे ही वैदिक इतिहासाशी प्रतारणा आहे. निमी वगैरे राजांच्या अवनतीलाही ब्राह्मण-कोप हेच कारण दिले आहे. ब्रह्मपुराणातील निमीची मुळची कथा पाहता मनुस्मृतीने सोयिस्कर फेरबदल केलेले दिसतात. वेदाभ्यासकांना हे माहित नव्हते कि काय कि त्यांनी मुद्दाम याकडे दुर्लक्ष केले? या व अशा अनेक बाबी आहेत जेथे मनुने खुद्द वेदांनाही धाब्यावर बसवलेले आहे. ही गरज मनुला कोणत्या काळात वाटली असावी हे पाहणे गरजेचे होते जे झाले नाही. मनुस्मृतीतील विश्वोत्पत्तीची कथाही अशाच भोंगळ कथांचे असंबब्ध कथांचे मिश्रण आहे. मनुस्मृतीत परस्पर विसंगत विधानांची रेलचेल आहे. ते कसे हे पुस्तकात सविस्तर दिलेले आहेच. पण त्याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे मनुस्मृतीच्व्ह्या हिंदी व मराठी अनुवादकांनी, विशेषत: विष्णूशास्त्री बापटांनी, सध्या उपलब्ध असलेल्या स्मृतीतील श्लोकांत जे शब्दच नाहीत ते पदरचे घालून अब्यासकांची गैरसोय तर केली आहेच मण मनुस्मृतीला सांप्रदायिक रुप आल्याने तिच्याबाबतचे गैरसमजही वाढवायची सोय केली आहे.
मनुस्मृती कोणत्यातरी विशिष्ट धर्माचे नियमन करणारी स्मृती आहे हे तर नक्कीच. या स्मृतीत "वेद हेच धर्माचा मुख्य स्त्रोत असून वेदविरोधी जेही काही आहे ते त्याज्ज्य आहे." असे वारंवार सांगितले आहे. किंबहुना या स्मृतीने धर्माची केलेली व्याख्या "वेद, स्मृती, सज्जनांचा आचार आणि स्वत:च्या आत्म्याचे समाधान या चतुर्विध बाबी साध्य करतो तो धर्म" अशी आहे. (मनू: २:१२). म्हणजेच वेद हा या धर्माचा प्रमुख आधार असल्याने त्याला आपण "वैदिक धर्म" असे म्हणणे जास्त संयुक्तिक आहे. म्हणजे वेद मानणा-यांचा धर्म अस्तित्वात होता त्याच वेळीस वेदांशी कसलाही संबंध नसलेल्यांचाही धर्म होताच. नसता तर वेदमान्यतेचे प्रस्थ माजायचे काही कारणच नव्हते. मनुस्मृतीतही वारंवार वेदविरोधी तत्वज्ञाने व आचारसंहिता याबाबत विरोध दाखवला आहेच. म्हणजे वैदिक धर्माच्या समांतर वेद मान्य नसलेला एक (किंवा अनेक) धर्म सहास्तित्वात होता. शिवशक्तीप्रधान धर्म अगदी वेदांचीही निर्मिती झाली नव्हती त्या काळापासून, म्हणजे सिंधू काळापासून, भारतात अस्तित्वात होता हे प्रत्यक्ष पुराव्यांनीच सिद्ध झाले आहे. असे असतांना संपुर्ण भारतियांचे ऐहिक व पारलौकिक नियमन ही स्मृती कशी करेल? वेद न माननारे अथवा जे धर्म वेदांच्या आधारावर उभेच नव्हते ते धर्म या स्मृतींच्या आज्ञा मुळात का पाळतील? बरे, तसे सामाजिक वास्तव असल्याचेही इतिहासात दिसुन येत नाही. असे असतांना जेंव्हा विद्वान मनुस्मृतीला "आपल्या संस्कृतीचा, आचाराचा आणि व्यवहाराचा आधारस्तंभ" म्हणतात तेंव्हा या विधानाची सत्यता पाहिली पाहिजेच अन्यथा आपल्याला आपल्या संस्कृतीचेच यथास्थित आकलन होणार नाही.
बरे, वैदिक धर्माची निर्मिती नेमकी कधी झाली? कोठे झाली? वैदिक धर्माची सुरुवात होण्याआधी वैदिक धर्म निर्मात्यांचा धर्म कोणता होता अशा प्रश्नांकडेही मनुस्मृतीचे टीकाकार अथवा समर्थक लक्ष देत नाहीत. वैदिक धर्म आक्रमक आर्यांद्वारे भारतात आला असे मत आताआता पर्यंत प्रबळ होते. समजा हे मत ग्राह्य धरले तर आर्यांनी उत्तरेपासून दक्षीणेपर्यंत व पुर्वेपासून पश्चिमेपर्यंत संपुर्ण भारत वैदिक धर्माच्या छत्रछायेत आणला व एतद्देशियांना तत्काळ शूद्र बनवत त्यांना गुलाम बनवले असेही आपल्याला गृहित धरावे लागते. खरे म्हणजे आर्य सिद्धांताचा हेतूही मुळात आक्रमक प्रबळ आर्य व एतद्देशिय दुर्बळ रानटी लोक यांच्यातील संघर्ष दाखवत अंती प्रबळ आर्यांचा विजय दाखवणे हा होता. या रानटी लोकांतील काही लोकांना क्षत्रीय व वैश्य वर्णात घेतले गेले व बाकीच्यांना चवथ्या वर्णात, म्हणजे शूद्रत्वात ढकलत त्यांच्यावर सेवेची जबाबदारी टाकली गेली. अशा रितीने चातुर्वर्ण्य आस्तित्वात आला असे मानले जाते. य शुद्रांच्या शिवादि देवतांना आर्यांनी पावन करुन घेतले हे मत अर्थातच जोडून येते. (वैदिक संस्कृतीचा इतिहास-तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी).
आक्रमण सिद्धांत प्रत्यक्ष पुराव्यांअभावी अडचणीचा ठरू लागल्यानंतर पाश्चात्य विद्वानांनी "आर्य स्थलांतर" सिद्धांताला जन्म दिला. हाही गृहित धरला तर मुळात आर्यांनी स्थलांतर का केले याचे उत्तर हा सिद्धांत देत्य नाही. स्थलांतरित आर्यांची संख्या किती हेही विद्वान सांगत नाहीत. स्थलांतरित आर्यांनी एतद्देशिय विशाल भुभागावर धर्म लादायचा तर त्यासाठी वैदिकांची संख्याही तेवढीच अवाढव्य असली पाहिजे. बरे, ते महापराक्रमी होते, म्हणून कमी संख्या असली तरी ते देशभर पसरले, हेही समजा मान्य केले तर तशा एक तरी युद्धाचे वर्णन, किमान सूचन, वैदिक साहित्यात आढळायला हवे. खुद्द मनुस्मृतीतही ते येत नाही. शिवाय देशभर पसरण्यासाठी व तेथे स्थायिक होण्यासाठी त्यांना येथील भुगोलही चांगला माहित पाहिजे. समजा आक्रमक अथवा स्थलांतरितांची संख्या तेवढी नसेल तर धर्मांतराच्या राजमार्गाने आपली संख्या वाढवावी लागेल. मग धर्मांतर करणारे कोण होते? धर्मांतर करण्यापुर्वी त्यांचा धर्म कोणता होता? या धर्मांतरितांना नवीन धर्माचे प्रशिक्षण त्यांनी कसे दिले असेल? समजा वैदिक धर्माचा जन्म येथेच झाला हे गृहित धरले तरीही हेच प्रश्न कायम राहतात कारण कोठेतरी (कुरु-पांचाल परिसरात) या धर्माची निर्मिती झालीच व तो अन्यत्र पसरवण्यासाठी खटाटोप हा करावाच लागला हे तर नक्कीच आहे. (The Quest for the Origins of Vedic Culture- The Indo-Aryan Migration Debate : EDWIN BRYANT, OXFORD UNIVERSITY PRESS 2001) भारतातील बव्हंशी वैदिक हे धर्मांतरित आहेत हे उघड आहे. ते धर्मांतर घडवण्यसाठे कोणते २७ धर्मप्रसारक वेदव्यासांनी नेमले याची कथा विष्णू पुराणातच येते. पण या धर्मांतराचे प्रमाण मोठ्या स्वरुपात नव्हते. जे धर्मांतरित नव्हते त्यांना सरसकट शूद्र असे संबोधले गेले हे प्राकृत साहित्यावरुनही स्पष्ट होते. उदा. जैन माहाराष्ट्री भाषेतील "अंगविज्जा" या इसवी सनाच्या दुस-या शतकातील ग्रंथातही अनेक व्यवसायिक जाती तसेच तत्कालीन कुशाण व शक यांनाही शूद्र्च म्हटले गेलेले आहे. असे असतांनाही शुद्रांबाबत एवढा गोंधळ विद्वानांनी का घातला हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो.
बरे, आक्रमण सिद्धांत गृहित धरला (किंवा अगदी पर्यायी मानला जानारा आर्य स्थलांतर सिद्धांत गृहित धरला तरीही) तर मनुस्मृतीच या सिद्धांतकांच्या पायात खोडा घालते, कारण मनुस्मृतीच्याही पहिल्या पर्वातील भुगोल दक्षीण अफगाणिस्तान आहे तर दुस-या पर्वातील भूगोल कुरु-पांचाल परिसरातील आहे. नंतर महत्वाचा मुख्य टप्पा मगध प्रांतातील वैदिकांचे अस्तित्व व प्राबल्यही दाखवते. शरणार्थी ते मगधात स्थैर्य प्राप्त केलेल्या व स्थैर्यातुनच ज्या सामाजिक समस्या कोणत्याही अल्प समाजात उद्भवतात त्या सोडवण्याच्या प्रयत्नांचे चित्रणाने याने मनुस्मृतीचा अधिकांश भाग व्यापलेला आहे. पुस्तकात यावर सखोल चर्चा असल्याने मी येथे अधिक लिहित नाही. पण मगध, कुरु-पांचाल व काही फुटकळ प्रदेश वगळता उरलेला देश तिला माहितच नाही. विंध्याच्या दक्षीनेला कोण राहतात याबद्दल तर अज्ञानच आहे. मग जे लोक माहित नाहीत त्यांच्यासाठी कोण नियम लिहिल आणि कोण पाळेल हा साधा विचार या विद्वानांना ते धर्म-गौरव-भ्रमात असल्यानेच सुचला नाही हे उघड आहे. इसवी सनाच्या दुस-या शतकापर्यंत या देशात ग्रीक, शक, हुण, कुशाणांसारख्या राजसत्ता प्रस्थापित झालेल्या होत्या. त्यांचे उल्लेख मनुस्मृतीत आहेतच. त्यांच्या धर्माचा उल्लेख मनुस्मृती करत नाही, पण त्यांना शूद्र, म्लेंच्छ अथवा कधी कधी यवन, चीन असे संबोधते, पण त्यांच्या सामाजिक जीवनाचे व श्रद्धांचे कसलेही उल्लेख करत नाही कारण त्यांच्या धर्माच्या नियमनासाठी मुळात स्मृती नाहीच.
बरे, ही स्मृती समग्र हिंदुंच्या नियमनासाठी लिहिली गेली म्हणावी तर मनुस्मृतीच त्यात मोठा खोडा घालते. म्हणजे बघा, या स्मृतीत यज्ञ व तत्संबंधी कर्मकांड आहे. तीन वर्णांचे वेदोक्त संस्कार अत्यंत काळजीपुर्वक लिहिलेले आहेत. अगदी कोणत्या वर्णाच्या माणसाने काय गुन्हा केला तर काय शिक्षा द्यावी याबाबतही निर्देश दिले आहेत. त्याबाबत तथाकथित शूद्रांना वाटणारा संताप आपण जरा दूर ठेवुयात. प्रत्यक्षात स्मृतीच काय सांगते?
मनूस्मृतीच सांगते कि शुद्रांची राज्ये आहेत. काही शूद्र यज्ञही करवून घेतात व असे शुद्रांसाठी यज्ञ करनारे ब्राह्मण श्राद्धविधीत निषिद्ध आहेत. देवपुजा करनारेही पुजारीही श्राद्धात निषिद्ध आहेत. मनुस्मृतीच्या सुरुवातीच्याच अध्यायांत हे सारे येत असता या व नंतरच्या अध्यायांत येणारी शूद्रविरोधी वचनेच तेवढी अवमानास्पद मानायची, मग या वचनांचे काय करायचे हाही प्रश्न उभयपक्षांना पडला नाही हेही एक नवलच होय. खरे म्हणजे वैदिक धर्मियांनी नियमन केले आणि न केलेले असे शूद्र नेमके कोण व हिंदू धर्माची वैदिकेतर व्याप्ती न समजल्याचा हा परिपाक आहे. मनुस्मृतीच्या आज्ञा ज्यांसाठी आहेत ते शूद्र कोण याचाही नीट अभ्यास झाला नाही. शूद्र म्हणजे समस्त भारतातील वैदिकेतर गुलाम लोक असाच साधारभ्ण समज सर्वांनी करुन घेतला हे एक दुर्दैवी वास्तव आहे. पण मनुस्मृतीच जे सांगते त्या राजांचे व धनाढ्यांचे काय करायचे? त्यांना मनुस्मृतीचे नियम का लागू नव्हते हा विचार न केल्याचा परिपाक म्हणजे आजचा हिंदू धर्मातील सावळा गोंधळ आहे.
प्रत्यक्षात इतिहासही सांगतो कि शिशूनाग वंशापासून भारतात शूद्र राजांची परंपरा सुरु होते. अगदी पहिला ज्ञात सम्राट चंद्रगुप्त मौर्यही शूद्र होता. सातवाहन, यादवादी असंख्य सत्ताही शुद्रांच्या होत्या. त्यामुळे मनू जर "शूद्रांच्या राज्यात निवास करु नये" अशा आज्ञा देत असेल तर त्यांचा ऐतिहासिक अन्वयार्थही समजावून घ्यायला हवा होता. ऐतिहासिक राजकुळांत एकही क्षत्रीय अथवा राजन्य नाही हे येथे लक्षात घेतले पाहिजे. शृंगांना तेवढे वैदिक ब्राह्मण समजायचा प्रघात आहे. त्याआधीच्या ज्ञानत इतिहासात एकही ब्राह्मण अथवा वैदिक राजा असल्याचे उल्लेख नाहीत. त्यामुळे पुराणे म्हणतात म्हणून हैहय, यदू, इक्ष्वाकू आदि घराणी क्षत्रीय होती असे समजायची प्रथा आहे. परंतू प्रत्यक्षात या घराण्यांचे ऐतिहासिकत्वच मुळात अजून नक्की नाही. महाकाव्ये व पुराणे यांना ऐतिहासिक मूल्य काय हा नेहमीच वादाचा विषय राहिला आहे. कारण या सर्वच साहित्यात घालघुसड, कल्पनाविलास व अनैतिहासिक अद्भुत गोष्टींची रेलचेल आहे. तरीही समजा पौराणिक व महाकाव्यांतील कथा ख-या मानायच्या झाल्या तर कृष्ण स्वत: असूर व असुरेतर संकरातून जन्माला आलेला आहे. कृष्णाच्या नातवानेही बाणासुराच्या कन्येशी विवाह करुन संकरच केला आहे. महाभारतातील व्यासापसुन ते सर्व कौरव व पांडव संकरीतच रक्ताचे आहेत. मनुस्मृतीप्रमाणे ते पाहिले तर कोणत्याही वर्णाच्या चौकटीत बसू शकत नाहीत. म्हणजेच ते वैदिक नाहीत. परंतू हे सत्य समोर असतांना त्याबाबत विद्वानांनी मौन पाळावे हे आश्चर्यकारक आहे.
महाराष्ट्राच्या दक्षीणेला म्हणाल तर इसवी सनाच्या तिस-या शतकापर्यंत तिकडे वैदिक धर्म पसरल्याचे वा गेल्याचे एकही सूचन नाही. यासाठी प्राचीन तमिळमधील संगम साहित्य हाच प्रबळ पुरावा आहे. महाराष्ट्रात हा धर्म पहिल्या शतकापर्यंत पोहोचला होता याचा संदर्भ मिळतो, पण महाराष्ट्रात त्याचा प्रचार-प्रसार झाल्याचे पुरावे मिळत नाहीत. मग या काळात वैदिक धर्म जेथे गेलाच नव्हता तेथील लोक काय धर्माशिवाय जगत होते कि काय? तसेही नाही कारण सातवाहन स्वत:ला "आगमान निलया" असे अभिमानाने म्हणवून घेतात. आगम म्हणजे अवैदिक तंत्रशास्त्रे तर निगम म्हणजे वेद.
सातवाहनांच्या काळात वैदिक धर्म येथे प्रवेशला असला तरी त्याचा प्रसार नव्हता याचे दर्शन हाल सातवाहनाच्या गाथा सप्तशतीतुनच मिळते. गाथा सप्तशतीचे संपादक स. आ. जोगळेकरांना गाथा सप्तशतीत वैदिक देवतांची व यज्ञांचीच काय ती अवहेलना दिसते व शैव आणि भागवत धर्माचे प्राबल्य दिसते. शिवाय गाथ सप्तशतीत ब्राह्मणांचा उल्लेख एकदाही अलेला नसल्याने जोगळेकर असा तर्क काढतात कि त्या काळात ब्राह्मण अत्यल्पसंख्य असले पाहिजेत. (गाथा सप्तशती, प्रस्तावना, स. आ. जोगळेकर, पद्मगंधा प्रकाशन, पृ. २१८-२२०) याचा अर्थ एवढाच कि मगध सोदून हा धर्म अन्यत्र जायचाच होता. तरीही येथे महाबलाढ्य सम्राट-सामंत-जमीनदार व व्यापारी होतेच व त्यांचा धर्म वैदिक नव्हता हे स्वयंस्पष्ट आहे.
इसपू सहाव्या शतकापासून ते इसच्या दुस-या शतकापर्यंतची नाणी व शिलालेख यावर शिव, उमा, कार्तिकेय, बुद्ध यांच्या प्रतिमा व नांवे आढळून येतात. अगदी कनिष्काच्या सुदूर अफगाणिस्तानातील राबटक शिलालेखातही उमा व कुमार कार्तिकेयाचे नांव आढळते, एकाही वैदिक देवतेचे नांव आढळत नाही. Mukherjee, B.N., "The Great Kushana Testament", Indian Museum Bulletin, Calcutta, 1995) या कुशाणही स्मृतींनुसार जर शूद्रच तर इतर एतद्देशियांची काय कथा? मग वैदिक काळ होता तरी कोणता आणि कधी? मगध व आसपासचा काही भाग वगळता हा धर्म अन्यत्र नव्हताच असे स्पष्ट पुरावे दिसत असता हे स्मृती "संपुर्ण देशाचे नियमन करणारी" कशी? मनुस्मृती जर हिंदुंचे नियमन करणारे आहे अशी "श्रद्धा" आहे, तर संपुर्ण स्मृतीत एकाही हिंदू देवतेचे नाव नाही. अगदी शिव-पार्वतीचेही नांव येत नाही. त्यांचे पुजाविधान कोठे येत नाही. किंबहुना मुर्तीपुजेचा अप्रत्यक्ष निषेधच केला आहे कारण "देवपुजा-यांना" श्राद्धात प्रवेशच नाही. असे असतांना मनुस्मृतीला हिंदू धरमाचे नियमन करणारी संहिता कसे मानता येईल?
मनुस्मृती हिंदुंच्या या परमदैवतांबाबत पुर्ण मौन बाळगते. वेद व वेदाचाराबाबत मात्र संपुर्ण मनुस्मृती समस्त आस्थेने बोलते. म्हणजे वेदाधारित वैदिक धर्माचे नियमन करण्यासाठी, प्रसंगी वेद-विधानांनाही उल्लंघत नवीन प्रदेशात तगण्यासाठी व पसरण्यासाठी धर्ममाहात्म्य वाढवण्यासाठी कराव्या लागणा-या सर्व क्लुप्त्या या स्मृतीत आहेत. ही स्मृती हिंदुंसाठी नाही कारण एकही हिंदु (आगमिक) देवतेचे नांव ही स्मृती घेत नाही. स्मृती जसे घेत नाही तसेच वेदही एकाही हिंदू देवतेचे नांव घेत नाही. कारण हे दोन्ही धर्म वेगळे आहेत याचे भान स्मृतीकारांना आहे. स्मृतीकारांनाच नव्हे तर दोन्ही समाजांनाही त्याचे भान आहे. भान नाही ते नंतरच्या सुधारणावादी विद्वानांना. त्यांनीच घोळ घातल्याने हिंदू धर्माचे अक्षम्य असे नुकसान झाले आहे. मनुस्मृती हे नेहमीच वैदिक धर्मियांचे अंतर्गत नियमन करण्यासाठी होती. वर्णाश्रम धर्म हा वैदिक धर्माचा पाया. यातील तीनच वर्णांना वेदाध्ययनाचा अधिकार असल्याने साहजिकच तेच वैदिक ठरतात. याच धर्मात शूद्र हा एक वर्ण आहे. हा वर्ण वैदिक नसल्याने "चतुर्वर्ण्य" हा शब्द तारतम्याने घ्यायला हवा होता. मनुस्मृती अनेकदा तो घेते तर कधी कधी तिचीही गाडी घसरते. यांना वेदांचाच काय संपत्ती संचयनाचाही अधिकार नाही. यांच्यासाठी कायदे वेगळे आहेत. म्हणजेच यांचाही धर्म वेगळाच आहे. पण ते वैदिकाश्रयी शूद्र आहेत हे मनुस्मृतीच स्पष्ट करते. हे असे वेदाश्रयी लोक होते तरी किती आणि किती काळ याबाबत स्मृती मौन आहे. पण गुप्त कालोत्तर समाजात वैदिकाश्रयी शुद्रांचेही प्रमाण क्रमश: संपुष्टात येत गेलेले दिसते. पण वैदिकेतर जेही कोणी आहेत त्यांना शूद्र संबोधण्याची वैदिकांची सवय कायम राहिली. पण म्हणून इतरांनी स्वत:ला शूद्र म्हणवले याची अत्यातिअल्प उदाहरने मिळतात. हिंदू आपली ओळख जातीनामानेच देत राहिले व देतात.
शूद्र नामक पश्चिमोत्तर भारतात एक टोळीच होती. अभीरांसमवेत या टोळीचे नांव महाभारतात खुपदा येते तसेच पुराणांतही येते. अलेक्झांडरचे या टोळीशी युद्धही झाल्याचे उल्लेख ग्रीक इतिहासकारांनी करुन ठेवले आहेत. (The Invasion of India by Alexander the Great-As described by Arrian, Q Curtis, Diodoros, Plutarch and Justin, edited by J. W. Mcrindle, page 354) भारतात आश्रयार्थ व धर्मप्रचारार्थ वैदिकांचा संबंध प्रथम आला तो या टोळीशी. या देशातील वैदिकेतर टोळ्यांना त्यांनी सरसकट शूद्र असेच संबोधले. मनुस्मृतीच्या शुद्रांविषयीच्या आज्ञा या वैदिकांच्या सेवेत असलेल्या शूद्र वर्गासाठी आहेत, देशात राहना-या अन्य समाजांसाठी नाहीत. समजा असत्या तरी अन्य धर्मीय त्या का म्हणून मान्य करतील? केलेल्याही नाहीत अन्यथा शूद्र राजे झाले नसते. वैदिकांना क्षत्रीय व वैश्य प्रकरण नंतरच्या काळात गुंडाळून ठेवावे लागले नसते, कारंण वैदिकांतला हाही वर्ग नंतर वैदिक धर्मातून बाहेर पडला हे नंद राजांच्या उदाहरणावरुनच स्पष्ट होते. परशुरामाची कथाही त्यासाठीच बनवण्यात आली.
मनुस्मृतीही कंबोज, यवन, शक, पारद, चीन या विदेशी समाजांना "पतीत क्षत्रीय" म्हणते (ते तसे नव्हते कारण मुळात त्यांचे धर्म वेगळे होते हे इतिहासानेच नोंदवुन ठेवले आहे.) तसेच औंड्र, दरद, किरात व द्रविड जातींनाही ती "पतीत क्षत्रीय" म्हणते. (मनू:- १०.४४) याच जमातींना ऐतरेय ब्राह्मण "शूद्र" म्हणते. पण मुळात औंड्रजातींच्या प्रदेशात पहिल्या शतकानंतर व द्रविड जातीच्या प्रदेशात तिस-या शतकानंतर जेथे प्रवेश व्हायला सुरुवात झाली तेथे तत्पुर्वीच काय नंतरही पतीत व्हायला का होईना क्षत्रीय असायला हवेत कि नकोत? हा केवळ अतिशयोक्ति व बढाईचा भाग होता एवढेच म्हणता येते. येथे मनुस्मृतीला पतीत क्षत्रीय म्हनजे "वैदिक धर्मीय नसलेले योद्ध्ये" असे म्हणायचे असेल असे दिसते, नाहीतर यवन, शकांसारख्या परकीय जमातींनाही पतीत क्षत्रीय म्हणण्याचे धाडस मनुस्मृती करने शक्य नाही हे उघड आहे. संदिग्धता व वैदिक माहात्म्य याची रेलचेल मनुस्मृतीत असने स्वाभाविक आहे. मुस्लिमही सारे जग ही आदमचीच प्रजा मानते तसेच हे. पण ते ऐतिहासिक वास्तव नव्हे. तसेच वैदिक धर्मियांनी सारे जग म्हणजे त्यांच्या वर्णव्यवस्थेत बांधल्याप्रमाने चालते असा समज असणे शक्य असले तरी ते ऐतिहासिक वास्तव नव्हे.
मी वैदिक धर्म व हिंदू धर्म याचे स्पष्ट वेगळे उल्लेख करतो याचे अनेकांना आश्चर्य वाटते. खरे तर तसे वाटायचे काहीएक कारण नाही. कारण अगदी एकोणिसाव्या शतकातील विद्वानही वैदिक धर्म वेगळा आहे असे स्पष्टपने नमूद करतात. एकोणिसाव्या शतकातील समाजसुधारक बहुविध हिंदू समाजाला वैदिक धर्मीय धारेशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत होते असे वसुधा दाल्मिया आपल्या "The Nationalism of Hindu Traditions" (१९९७, पृ. ३८३) या ग्रंथात म्हणतात. आर्य समाजाची स्थापना सर्वांनाच वैदिक धर्मात सामावून घ्यावे यासाठीच झाली होती असे नंदिनी गुप्ता म्हणतात. (The Urban Poor and Militant Hinduism in Early Twentieth Century, पृ. ८९५) महाराष्ट्रात लोकमान्य टिळक हे मात्र वैदिक धर्मात अन्यांना स्थान देण्याच्या विरोधात होते. उलट ते चित्पावन ब्राह्मणाचे वर्चस्व अन्यही ब्राह्म्णांवर कसे राहील याच प्रयत्नांत होते. ते लोकहितवादी आणि महात्मा फुलेंना "वैदिक धर्म-संस्कृती विध्वंसक" मानत तर प्रार्थना समाज व न्या. रानडे यांना "वैदिक धर्माचे" उद्धारक मानत. (Foundation of Tilak's Nationalism, प्रमिला व्ही. राव, पृ. १९) थो्डक्यात अनेक ब्राह्मण पुनरुज्जीवनवादी विद्वान वैदिक धर्माचाच आधार घेत होते. याचाच अर्थ असा कि सुधारणावादी असोत कि पुनरुज्जीवनवादी, सर्वच वैदिकवादी विद्वानांचा भर वैदिक धर्मावरच होता तर वैदिक व्यवस्थेलाच विरोध असना-या तत्कालीन बहुजनवादी विद्वानांचा भर वैदिक व्यवस्थेवर प्रहार करण्याचा होता. म्हणजेच वैदिक धर्म वेगळा आहे व बहुजनांचा धर्म वेगळा आहे याची जाण ते जरी ब्रिटिशांकरवी कागदोपत्री "हिंदू" म्हणुनच संबोधले जात असले तरी, बाळगून होते.
डा. सुधाकर देशमूख म्हंणतात कि वैदिक धर्म हा स्वतंत्र असून आगमिक तंत्रमार्गी धर्म सिंधुकाळापासून अस्तित्वात आहे. दोन परंपरा सर्वस्वी पथक असून उलट अथर्ववेदावर तंत्रांची उघड छाप आहे. आजचा हिंदू धर्म ८५% तंत्रप्रभावित आहे. मध्ययुगात (निबंधकाळात) वैदिक धर्मियांनी पुन्हा उचल खात मुलतत्ववादाचा आश्रय घेत तंत्र व नाथसंप्रदायाने जी समतेचे झुळूक आणली होती तोला बाध आली. (मध्ययुगीन धर्मसंकल्पनांचा इतिहास : तंत्र, योग, आणि भक्ती-डा. सुधाकर देशमूख.) थोडक्यात वैदिक धर्म व आगमिक अथवा तंत्रोक्त धर्म वेगळे आहेत याची जाण विद्वानांना होती व आहे. वैदिक धर्म वेगळा उल्लेखन्यात काही अकल्मित आहे असे नाही. या दोन धर्मात समन्वयाचे प्रयत्न झाले नाहीत असे नाही पण वैदिक धुरिणांनी आपले लक्ष केवळ वैदिक अधिसत्ता टिकवण्याचे प्रयत्न केले त्यामुळे हे प्रयत्न अयशस्वी झाले असेच म्हणवे लागेल. त्यात आर्य सिद्धांताने धार्मिक विभेद हा वांशिक विभेदात बदलला गेला होता हाही इतिहास आहे. टिळकांचे आर्क्टिक होम इन वेदाज" या ग्रंथाने त्यात भरच घातली असे म्हणावे लागते.
जातिप्रथा व मनू
जातीव्यवस्था मनुने निर्माण केलेली नाही. जाती म्हणजे व्यवसाय. व्यवसाय बदलाचे स्वातंत्र्य किमान दहाव्या शतकापर्यंत होते हे मी माझ्या "जातिसंस्थेचा इतिहास" या पुस्तकात दाखवून दिले आहे. विषमता जी निर्माण झाली तिचे मुलकारण नंतर निर्माण झालेल्या अर्थव्यवस्थेतील विषम बलुते पद्धतीत आहे हेही मी स्पष्ट केले आहे. मनुस्मृतीचा त्याशी काही संबंध नाही. जाती या वर्ण-संकराने निर्माण झाल्या असे मानायची एक पद्धत आहे. पण वैदिक वर्ण संकराने निर्माण झालेल्या जाती कोणत्या हे पाहिले तर "वर्णसंकर भ्रम"ही दूर होतो. खरे तर वर्ण संकराची भिती वैदिकांतच किती होती हे मनुस्मृतीच नव्हे तर भग्वद्गीतेवरुनही स्पष्ट दिसते. आजही काही वैदिक विद्वान वर्णव्यवस्था कशी उत्तम व वर्णसंकर कसा वाईट हे अगदी भाविकतेने सांगत असतात.
मनुनुसार अनुलोम-प्रतिलोम स्वरुपाचे विवाह अथवा शरीरसंबंधातून निर्माण झालेल्या प्रजेला संकरज मानत वेगवेगळ्या संकरापासून आयोगव, धिग्वन, अंत्यज, पारशव, सूत, मागध इत्यादि जाती निर्माण होतात. पण या उल्लेखिलेल्या सर्वच संकरित जाती भारतात आजच काय पण गुप्तकालापासुनही प्रत्यक्षात अस्तित्वात असल्याचे दिसत नाही. संकरज व्यक्ती असल्या तरे "जाती" बनण्याएवढी त्यांची संख्या असणे शक्य नाही. फार फार तर अशा काही व्यक्तींना त्या त्या संकरज जातीनामाने संबोधले जात असेल.
आणि ज्या जाती आज शूद्र मानल्या जातात त्यातील एकही जात "शूद्र" म्हणून मनुस्मृतीत उल्लेखलेली नाही. उदाहरणार्थ, देव-पितरांच्या कार्यात व श्राद्धात कोणाला प्रवेश नको याबाबत तिस-या अध्यायात आज्ञा असून शूद्र, मंदिरात पूजा करुन अर्जन करणारे, वैद्य, पशुपालक, मेंढपाळ, अभिनेते, नर्तक, द्यूतगृहे चालवणारे, मांस व मद्य विक्रेते, सूत, तेली, शेतकरी, शिल्पी, दूतकार्य करणारे, शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देणारे वगैरे व्यवसाय करणारे त्याज्ज्य म्हटले आहेत. (अध्याय ३. १५२-१६६) . यात उल्लेखिलेल्या सर्व जाती व्यवसायाधिश्घ्ठित आहेत व त्यांना शूद्र म्हणलेले नाही. उलट शूद्र या संज्ञेचा स्वतंत्र उल्लेख आहे. या सर्वच जाती शूद्र असत्या तर त्यांना एकत्रीतपणे शूद्र असे उल्लेखिले असते. पण ते वास्तव नाही हे मनुस्मुतीवरुनच दिसते. डा. अजय मित्र शास्त्रीही म्हणतात कि "जाती अस्तित्वात येण्याचे महत्वाचे कारण म्हणजे व्यवसाय हेच होय. परंतू जातींना पारंपारिक सामाजिक संरचनेत कसे सामावून घ्यायचे या प्रश्नापोटी जातींच्या उत्पत्तीची वेगवेगळी स्पष्टिकरने तयार केली गेली." येथे पारंपारिक संरचना म्हणजे वर्णव्यवस्था असा अर्थ अहे. ते पुढे म्हणतात, "धर्मशास्त्रकारांनी आंतरवर्णीय अनुलोम व प्रतिलोम असे विवाहाचे प्रकार गृहित धरुन त्यांना वर्ण सिद्धांताच्या चौकटीत सामावून घेण्याचा प्रयत्न केला. पण या व्यावसायिक जातींनी स्वत:च आपले तत्कालीन कोरीव लेखांत केलेले उल्लेख पाहता हा प्रयत्न यशस्वी झाला नाही हेच स्पष्ट होते. (महाराष्ट्र ग्यझेटियर-इतिहास:प्राचीन काळ, खंड १) म्हणजेच त्या जाती संकरातून निर्मण झाक्लेल्याच नव्हत्या. तसेच एकाही जातीने आपल्याला कोठेही शूद्र म्हनवून घेतलेले नाही हेही येथे उल्लेखनिय आहे. पण प्रतिपाद्य मुद्दा असा कि अनुलोम-प्रतिलोम संततीमुळे निर्माण होना-या समस्या हे वास्तव असले व त्या संततींना वेगवेगळ्या जातीनांवांनी ओळखले जात असले तरी या जाती समाज बनण्याएवढ्या संख्येच्या नव्हत्या हे उघड आहे. ज्याअर्थी या जातीच नंतर नाहिशा झाल्या त्याअर्थी ही व्यवस्था वैदिक धर्मातही टिकू शकली नाही. पुढे क्षत्रीय व वैश्य हे वर्णच वैदिक धर्मातून वजा झाल्यानंतर व वैदिकंच्या सेवेतील शूद्र वर्णही निघून गेल्यानंतर आंतरधर्मीय संकर झाले तरी त्याचे काय करायचे हाही प्रश्नच होता. थोडक्यात आज आहे त्या जातिसंस्थेचे कर्तुत्व मनुस्मृतीला देता येत नाही. संकरज वैदिक जाती कधीच नष्ट झाल्या असून आजच्या जाती या संकरज नव्हेत हे येथे पक्के लक्षात ठेवले पाहिजे.
म्हणजे, शूद्रांसाठीची बंधने ही नेमक्या कोणासाठी, कोणत्या धर्मासाठी हेच समजावून न घेतल्याने, विशेषत: ब्रिटिश काळात, मनुस्मृती (व अन्यही मिताक्षरासारख्या स्मृतींमुळे) नुसता सामाजिकच नव्हे तर राजकीय गोंधळ सुरु झाला. ते कसे हे समजावून घेणे गरजेचे आहे. तत्पुर्वी स्मृतीनुसार घातली गेलेली शुद्रांवरची बंधने अगदी मध्यकालातही कोणी पाळलेली दिसत नाहीत. मुळात हिंदुंसाठी ही स्मृती नव्हतीच याचे भान राज्यकर्त्याना, धर्मपंडितांना व समाजांना होतेच. भारतातील अवैदिक हिंदू समाज हे नेहमीच आपापल्या कुल (जाती)धर्मानुसार नियंत्रित झालेले आपल्याला दिसतात. त्यांचे नियमन केले ते त्यांच्या-त्यांच्या जातींनी, जात पंचायतींनी. जाती जोवर सैल होत्या (किमान दहाव्या शतकापर्यंत) त्यांचे नियमन त्या-त्या व्यवसायांच्या श्रेण्या करीत. श्रेणी व्यवस्था सर्वात पुरातन असून श्रेंणी धर्माचा उल्लेख मनुस्मृतीही करते. हा धर्म स्वतंत्र आहे असाच मनुस्मृतीचा अभिप्राय आहे. अवैदिक (म्हणजे हिंदुंच्या) स्मृत्या होत्या असाही उल्लेख मनुस्मृती करते, म्हणजे जातीनियम लिखित स्वरुपात असण्याचीही शक्यता आहेच. पण आज तरी आपल्याला लिखित स्वरुपात त्या आपल्याला उपलब्ध नाहीत.
पण साहित्य व ताम्रपटीय पुराव्यावरून दिसते कि समाज जीवन खुपच मोकळे होते. जातीभेद फारसा अस्तित्वात नव्हता. हिंदू स्त्रीयांना पुरेसे स्वातंत्र्य होते. विवाह मुले वयात आल्यानंतरच होत. ब्रिटिश राज्य आल्यावर संमती वयाचा जो प्रश्न उद्भवला तो वैदिकांबाबत, हिंदुंबद्दल नव्हे. वैदिक अनुकरणाने काही हिंदू जातींतही बालविवाह घुसला असला तरी त्याचे प्रमाण अल्प होते असेच आपल्याला दिसते. घटस्फोट, पुनर्विवाह, विधवा विवाह या बाबतीत प्रत्येक जातीचे स्वत:चे नियम असले तरी असे विवाह आता आता पर्यंत सर्रास होत असत. सैन्यदलांत व शासकीय सेवांत सर्वच जातीघटकांना प्रवेश होता. विविध जातींची आर्थिक स्थिती मंदिरे व बौद्ध विहारांना दान देण्याइतपत सुदृढ होती हेही कोरीव लेखांवरून स्पष्ट दिसते. मनुस्मृती त्यांना लागू असती तर त्यांना मुळात संपत्तीसंचयाचाच अधिकार नव्हता तर ते दान कोठून देणार? आणि अभिमानाने आपापल्या जातीचा (व्यवसायाचा) उल्लेख कसा करणार? आज अस्पृष्य मानले गेलेल्या समाजांतील काही पुरेसे धनाढ्य होते. पाटील, किल्लेदार ते सेनानी बनत होते याचे पुरेसे पुरावे उपलब्ध आहेत. क्षीरसागरांनी प्रस्तूत पुस्तकात यावर पुरेसा प्रकाश टाकलेला आहेच.
मनुस्मृतीला सर्वच हिंदू समाजाची संहिता समजण्याची चूक भारतियांची नसून ब्रिटिशांची आहे हे आपण आधी लक्षात घ्यायला हवे. पाश्चात्य विद्वान संस्कृत भाषा व त्यातील साहित्याकडे आकृष्ठ झाले ते दोन कारणांनी. पहिले कारण निखळ स्वार्थाचे होते. वंशवादाने पिडलेल्या पाश्चिमात्यांनी संस्कृत भाषेला पुरा-इंडो-युरोपियन भाषा ठरवत आपला इतिहास मागे न्यायला सुरुवात केली. आर्य वंश वादाची सुरुवात तेथेच झाली. विल्यम जोन्सने सर्वात आधी, म्हणजे १७६४ मध्येच मनुस्मृतीचा इंग्रजीत अनुवाद केला. संस्कृतात जेही काही आहे ते ब्राह्मणांचे व ब्राह्मण हेच समग्र हिंदू धर्माचे नियामक असल्याच्या समजुतीतून सर्व स्मृतीही हिंदुंच्या नियमनासाठी लिहिल्या गेल्या हा त्यांचा समज झाला. प्रत्यक्षात वैष्णव वगळता शिव (व अन्य) मंदिरांचे पुजारी गुरव अथवा स्थानिक कोणत्याही जातीचे हिंदू असत. वैदिक समाजात मंदिर पुजा-यांना वैदिक धर्मव्यवस्थेत अत्यंत गौण स्थान आहे हेही येथे लक्षात घ्यावे लागते.
आर्य आक्रमणवाद ब्रिटिशांच्या हाताशी असल्याने स्मृतींतील शूद्र हे आक्रमक आर्यांने हरवलेले दास-दस्य़ु होत असा त्यांचा समज झाला. त्यांच्या दृष्टीने स्मृती या सर्व हिंदुंची धर्मशास्त्रे होत. वर्ण व जाती या दोन अत्यंत वेगळ्या संकल्पना असतांनाही त्यांनी वर्ण व जातींना एकच समजत त्याचा अनुवाद सरसकट "कास्ट" (caste) असा केला. येथील कायदे बनवतांनाही त्यांनी मनुस्मृतीचाच विशेषकरुन आधार घेतला. म्ह्णजे जे हिंदू या स्मृतींच्या कक्षेबाहेर होते तेही कारण नसतांना त्या कक्षेत आणले गेले. भारतातील एवढ्या जाती व प्रत्येक जातीच्या प्रथा अभ्यासण्याएवढा वेळही त्यांच्याकडे नव्हता. "The Sanskrit pandits were hired to translate and sanction a new interpretation of customary laws created a curious Anglo-Brahmanical hybrid ...in which the pandits dutifullyu followed the demands made by their paymasters." असे मधु किश्वर म्हणतात ते योग्यच आहे. (मानुषी, भाग-१२०, ) वारेन हास्टिंग्जने १७७२ मध्येच काही ब्राह्मण पंडितांना नियुक्त करुन त्यांची हिंदू कायदे बनवण्यासाठी मदत घेतली. हे असे होऊ देणे त्यांच्याही राजकीय सोयीचे होते. हिंदू व्यक्तिगत कायदा या पद्धतीने बनवला गेला व स्वातंत्र्यानंतरही कही बदल करुन तोच चालू राहिला. त्याचा मुलाधार मनुस्मृतीच असल्याने व त्यातील सामाजिक विषमतेचे तत्वज्ञान, जे आधी वैदिक वगळता हिंदू धर्मात अस्तित्वात नव्हते, ते अस्तित्वात आणुन इंग्रजांना येथे राज्य करणे सोपे गेले. एतद्देशिय अडाणी जनतेच्या हे लक्षात आले नाही. "शास्त्रांमध्ये जे लिहिले आहे ते विवेकावर आधारित नसेल तर स्विकारता येणार नाही." व "वैश्विक नीति व सत्याशी द्रोह करणारे शास्त्रवचन स्विकारार्ह असू शकत नाही." असे महात्मा गांधी स्मृतींबद्दल म्हणाले होते. (The Collected Work of Mahatma Gandhi, Vol. LXII, p. 121).अर्थात त्यांचाही समज स्मृती या समग्र हिंदुंसाठीच अहेत असा गैरसमज होताच. स्वातंत्र्योत्तर काळात हिंदू कोड बिलानेही वादळ उठवले. परंतू ब्रिटिश राजवटीत भारतीय जातींचे परस्पर संबंध बदलले एवढे नक्की. जातींचे निर्मितीचे श्रेय बिनदिक्कतपणे स्मृत्यांना देण्यात आले. जवळपास दोनशे वर्षांच्या या काळात नवशिक्षित हिंदुंनाही जातींची निर्मिती मनुस्मृतीनेच केली असे वाटु लागले. ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाचे बीज ब-यापैकी या समजुतीकडे जाते. मुळात वादाचा विषय दोन धर्मांना एक समजणे हा होता पण तिकडे मात्र सुधारणावाद्यांचे लक्ष गेले नाही हे भारताचे दुर्दैव होय
थोडक्यात, मनुस्मृती व त्याआधारित सर्वच स्मृत्या, ज्या केवळ आणि केवळ वैदिक धर्माच्या नियमनासाठी होत्या, त्याच सुधारित व आधुनिक स्वरुपात समग्र हिंदुंसाठी गृहित धरण्यात आल्या. ब्रिटिश काळातच मनुस्मृतीविरुद्ध आवाज उठू लागले कारण ब्रिटिश कायदेही हिंदुंना माहितही नसलेल्या स्मृती कायद्यांवर आधारित होते. सामाजिक चळवळींचा स्मृती हा एक आधार बनला असे म्हटले तरी वावगे हो्णार नाही. हिंदू कोड बिलावरही स्मृत्यांचा प्रभाव आहे हे अमान्य करता येत नाही. ब्रिटिशकाळाने लयाला गेलेल्या स्मृत्यांचे माहात्म्य अपरंपार वाढवले. तत्पुर्वी अगदी पेशवाईतही अन्य जातींचे निवाडे करतांना कधीही स्मृतींचा वापर करण्यात आला नाही असे क्षीरसागरांनी पुढे स्पष्ट केलेच आहे. मला वाटते ते विवेचन मुख्य मुद्दा स्पष्ट करायला पुरेसे आहे.
अस्पृश्यतेचा प्रश्न
अस्पृष्यतेचा प्रश्न हा अत्यंत जटिल आहे हे येथे मान्य केलेच पाहिजे. या प्रश्नावर मी व संजय क्षीरसागर गेली अनेक वर्ष डोकेफोड करत आहोत. मनुस्मृतीत काही संकरज जाती (उदा. अंत्यज, चांडाळ, श्व[अच, धिग्वन) अस्पृष्य मानल्या गेलेल्या आहेत. प्राकृत साहित्यावरुनही काही जातींना गांवात येतांना काही चिन्हे बाळगांवी लागत, गांवात राहणारे असले तर घरांवर काही चिन्हात्मक खुणा कराव्या लागत असे मोघम उल्लेख आढळतात. अस्पृष्यतेची कारणमिमांसा अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने केली असली तरी अद्याप तिचा समाधानकारक उलगडा झालेला नाही. आज अस्पृष्य मानल्या जातींपैकी एकाही जातीचा उल्लेख मनु व अन्य स्मृत्यांतंच काय पण पुराणंतही आढळत नाही. फक्त जैनांचा आदिपुराणात धोबी, सुतार व लोहारांना अस्पृष्य वर्गात घातलेले आढलते. पण यांना प्रत्यक्षात हिंदू अस्पृष्य मानत नाहीत. परंतू अस्पृष्यता वास्तवात होती हे एक वास्तव आहे.
उदा. महार समाज हा मुळचा ग्रामरक्षण, व्यापारी तांड्यांचे रक्षण करनारा समाज. वेशीचे रक्षण करणे, चोरी झाली तर चोरांना पकडणे, जन्म-मृत्युची नोंद ठेवणे, शेतीतील-गांवातील तंटे उद्भवले तर साक्ष देणे (त्याचीच साक्ष अंतिम मानली जाई), राजे-सरदारांचे व्यक्तीगर अंगरक्षक म्हनून कामे करणे इत्यादि अत्यंत महत्वाची कामे त्यांच्यावर सोपवलेली असायची. ही प्रथा ब्रिटिशकाळापर्यंत चालू असल्याचे दिसते. या कामांत कालौघात काही हीणकस कामांचा, म्हणजे मृत जनावर ओश्ढून नेणे, गांवातील स्वच्छता राखणे ई. समावेश झाला. असे असले तरी महारांना अस्पृष्य़ का मानले गेले याचा समाधानकारक उलगडा होत नाही.
बरे ही अस्पृष्यता गांवपातळीवरील काम करणा-यांबाबत पाळली जात होती का सर्वत्र हा विचार केला तरी गोंधळाचे चित्र सामोरे येते. उदा. सतराव्या शतकातील काही दस्तावेजांवरून दिसते कि सैन्यातील महारांबाबत अस्पृष्यता पाळली जात नव्हती. इतकेच नव्हे तर त्यांचे वेतन व इतरांच्या वेतनातही फरक नसे. त्यांना पराक्रम गाजवल्याबद्दल जमीनी इनाम दिल्या जात. अगदी शनिवारवाड्यातही महार रक्षकांचे पथक होते. शिवकाळात ते अनेक किल्ल्यांचे किल्लेदार असल्याचे दिसते. या व अशा अस्पृष्य मानलेल्य गेलेल्या जाती व मनुस्मृती यांत काही संबंध आहे काय हे तपासता लक्षात येते कि अस्पृष्यतेची भावना मनुस्मृतीत दिसत असली तरी हिंदुंत अनुकरणाने आली कि तिची निर्मिती स्वतंत्रपणे झाली याचा उलगडा होत नाही. खरे तर तंत्र मार्गात, विशेषत: नाथ पंथात अस्पृश्यता हा प्रकारच अस्तित्वात नसल्याचेही आपल्याला दिसते. पण वैदिक धर्माचे निकटचे साहचर्य एकमेकांत काही अनिष्ट प्रथा निर्माण व्हायला कारण ठरल्या हे निश्चित आहे. जैन धर्मात अन्यथा अस्पृष्य जातींचा उल्लेख येण्याचे अन्य कारण दिसत नाही. वैदिक धर्मात नसलेल्या जाती या हिंदुंमुळे जशा निर्माण झाल्या तसेच वर्णांतील उच्च-नीचतेच्या भावना उत्तर युगात हिंदू धर्मात प्रवेशल्याचेही आपल्याला दिसते. यावर अजुनही खूप संशोधन व्हायची गरज आहे हे मात्र निश्चित.
मनुस्मृतीतून प्रकट होनारी महत्वाची बाब म्हणजे एका समाजाच्या कालौघात झालेल्या स्थित्यंतरांचा, बदललेल्या विचारांचा, त्यांच्यासमोर आलेल्या समस्या व त्यासाठी त्यांनी शोधलेल्या मार्गांचा एक व्यापक आलेख यातून मिळतो. या दृष्टीने आजवर मनुस्मृतीचे परिशिलन झालेले नव्हते. या निमित्ताने ते व्हायला मदत होईल अशी आशा मला आहे.
संजय क्षीरसागरांच्या या अमोलिक ग्रंथामुळे भारतीय समाजावर अकारण पडलेले सावट दूर होत हिंदुंनी नकळत गेली काहिशे वर्ष जोपासलेली न्य़ुनगंडाची भावना दूर होण्यात नि:संशय मदत होणार आहे. आजवर मनुस्मृतीचा दुरुपयोग करत त्यातील समाजव्यवस्थेचे निर्देशन नेमके कोणासाठी आहे हे स्पष्ट केले गेले नव्हते. ब्रिटिश व एतद्देशिय तत्कालीन विद्वानांनी आपापली लौकिक सोय पाहिल्यामुळे समाजात एक तंणाव तर निर्माण झालाच पण शूद्र नसतांनाही अनेकांना शूद्र समजत व त्यांनाही ते शूद्रच आहेत असा समज निर्माण करवून देत जो न्युनगंड निर्माण केला गेला याची सामाजिक परिणती विकासशील न राहता परस्परविरोधाची, संघर्षाची होण्यात झाली. खरे तर बाबासाहेबांनंतर हे काम दुस-या पिढीच्या विद्वानांनी निकोपपणे पुढे न्यायला हवे होते. तसे न करता ते ब्राह्मणद्वेषाच्याच गर्तेत अडकल्याने त्यांच्याकडून मनुस्मृतीची समग्र चिकित्सा झाली नाही. संजय क्षीरसागरांनी ख-या संशोधकाच्या भुमिकेत जात तटस्थपणे मनुस्मृतीची जी चिकित्सा केली आहे ती मनुस्मृतीचे विरोधक व समर्थक या दोन्ही पक्षांना नवा दृष्टीकोण देण्यास समर्थ आहे याबाबत माझ्या मनात शंका नाही.
पुस्तकात मनुस्मृतीतील श्लोकांचे संगतवार विश्लेशन आपल्याला मिळेल. खुद्द स्मृतीकारांनी कोठेकोठे विसंगत घोळ घातला आहे याचेही दर्शन आपल्याला होईल व एका प्राचीन समाजाचे नियमन कसे करंण्याचे प्रयत्न होत होते, कशा अडचणी येत होत्या याचेही दिग्दर्शन होईल. आज "मनुवाद" हा कळीचा शब्द बनला आहे या काळात अशा पद्धतीने मनुस्मृतीची तटस्थ चिकित्सा होणे ही अपल्या एकंदरित समाजजीवनासाठी निश्चितच उपकारक आहे यात शंका नसावी. मनुस्मृती अथवा अन्य स्मृतींमुळे आमची अवनती झाली असे असंख्य सामाजिक चलवळींचे धुरीण गेले दीड शतक ओरडत आहेत, त्यांनाही या पुस्तकामुळे पुनर्विचार करणे भाग पडेल. मनुस्मृतीचे पाखंड निर्माण करण्यात या स्वत:ला "बहुजनीय" म्हनवणा-या विचारवंतांचा मोठा वाटा आहे हे नमूद करण्यात मला कसलाही संकोच वाटत नाही.
धन्यवाद.
-संजय सोनवणी
Saturday, September 28, 2019
पुरातत्त्वशास्त्राचेही सांस्कृतिक राजकारण...

पुरातत्त्वशास्त्रातील अग्रगण्य संस्था असणाऱ्या पुण्यातील डेक्कन कॉलेजमधील पुरातत्त्वशास्त्रज्ञ गेल्या काही वर्षांपासून हरियाणातील राखीगढी इथे उत्खनन-संशोधन करत आहेत. या उत्खननातून बाहेर येणाऱ्या पुराव्यांमधून जुनी गृहितकं बदलून अनेक माहिती चुकीच्या पद्धतीने नव्याने समोर येत आहे. भारतीयांच्या मुळाचा प्रश्न सुटला आहे असे वातावरण त्यातून निर्माण झाले. या दाव्यांना "सेल' आणि "सायन्स' या प्रतिष्ठित नियतकालिकांत प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधांचा आधार घेतला गेला आहे. मात्र मूळ शोधनिबंध न वाचताच पुरातत्त्वशास्त्राचा सांस्कृतिक राजकारणासाठी कसा उपयोग केला जातो यावरची ही सखोल आणि अभ्यासपूर्ण रोखठोक मते...
"आर्य मूळचे भारतातलेच... आर्य आक्रमण सिद्धांत चुकीचा... हडप्पा संस्कृतीचे लोक संस्कृत भाषा बोलत... त्यांची संस्कृती वैदिक होती... आजच्या भारतीयांमध्येही तीच जनुके झिरपत आलेली असून या लोकांची आनुवांशिकी स्वतंत्र आहे. परकीयांचा त्यावर नगण्य प्रभाव आहे,' असे दावे डेक्कन कॉलेजचे कुलगुरू व हरियाणाच्या राखीगढी येथील उत्खननाचे प्रमुख डॉ. वसंत शिंदे यांनी केले. ते सर्व भारतातील वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केले आणि खळबळ माजली. भारतीयांच्या मुळाचा प्रश्न सुटला आहे असे वातावरण त्यातून निर्माण झाले. या दाव्यांना "सेल' आणि "सायन्स' या प्रतिष्ठित नियतकालिकांत प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधांचा आधार घेतला गेलेला होता आणि या दोन्ही शोधनिबंधांचे डॉ. शिंदे हे प्रमुख सहलेखक असल्याने हे दावे सत्यच आहे असा आभास निर्माण होणे स्वाभाविक होते. मूळ लेख सहसा जनसामान्य वाचण्याच्या भानगडीत पडत नसल्याने या विधानांमागचे संघप्रणीत सांस्कृतिक सहज पुढे नेता येणे शक्य झाले. पण आपण वस्तुस्थिती तपासून पाहिली पाहिजे. पुरातत्त्वशास्त्राचा सांस्कृतिक राजकारणासाठी उपयोग करणे गैर असले तरी असे झाले आहे हे दुर्दैव आहे.
पहिली बाब म्हणजे "आर्य' हा शब्दच मुळात दोन्ही शोधनिबंधांमध्ये वापरलेला गेलेला नाही तर इंडो-युरोपियन भाषा बोलणारे पूर्व युरोपातील 'स्टेपे' येथील भटके पशुपालक हा शब्द वापरला गेलेला आहे. त्यांचे इराणमार्गे स्थलांतर इसपू दोन हजार ते एक हजार या काळात सुरू झाले व ते कधीतरी नंतरच्या टप्प्यात पण इसपू एक हजारच्या आधी भारतात आले. नंतरच्या उत्तर भारतीय रहिवाशांमध्ये (म्हणजे आजच्या) इराणी व स्टेपे भागातील भटक्या पशुपालकांच्या जनुकप्रवाहाचे प्रमाण जास्त (म्हणजे अधिकाधिक ३०%) आहे. इंडो-युरोपियन भाषा त्यांनीच आपल्या सोबत आणल्या असाव्यात व त्यांचा उत्तर भारतात प्रसार झाला. राखीगढी येथील स्त्रीचा सांगाडा आहे तो इसपू २६०० मधला. म्हणजे आजपासून ४६०० वर्षे जुना. त्या सांगाड्यातील जनुकांत मात्र स्टेपे जनुकप्रवाहाचे अस्तित्व नाही. इराणी जनुकांचे प्रमाण नगण्य स्वरूपात आहे, पण सिंधू संस्कृतीच्या व्यापारामुळे या प्रदेशाशी येणाऱ्या नित्य संबंधांमुळे हा जनुकप्रवाह किंचित झिरपला असावा असे निष्कर्ष काढले असून एकाच सांगाड्यातून मिळालेल्या जनुकांमधून काढला गेलेला निष्कर्ष परिपूर्ण असणार नाही. यासाठी अधिक नमुन्यांना शोधून त्यांच्याही जनुकांचा सिक्वेन्स लावला पाहिजे, अशीही सूचना शोधनिबंधात केलेली आहे.
हे झाले मूळ शोधनिबंधांत काय आहे याचा सारांश. या लेखांचे सहलेखक जगमान्य बहुशाखीय विद्वान आहेत. या सारांशावरून लक्षात येईल की, वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेल्या दाव्यांत आणि शोधनिबंधातील निष्कर्षात यत्किंचितही साम्य नाही. आर्य इथलेच, सरस्वती नदी म्हणजे घग्गर नदी, वेदरचना येथेच झाली वगैरे दावे रा. स्व. संघप्रणीत विद्वान गेली अनेक दशके करत आलेले आहेत. गेल्या शतकाच्या सुरुवातीला आक्रमक आर्यांनीच सिंधू संस्कृती उद्ध्वस्त केली असे मत प्रचलित होते. पण त्यामुळे आक्रमक आर्य विरुद्ध द्रविड असा एक सांस्कृतिक, अनेकदा हिंसकही झालेला संघर्ष पेटला, तर दुसरीकडे मूलनिवासीवादही जन्माला आला. त्यामुळे स्वत:ला वैदिक आर्य समजणारे, सांस्कृतिक वर्चस्वतावाद जपणारे वैदिक धर्मीय अस्वस्थ झाले आणि आपण मूळचे इथलेच हे सांगायला सुरुवात केली. हे प्रकरण इथेच थांबले नाही तर सिंधू संस्कृतीचे निर्माते वैदिक आर्यच असेही रेटून सांगायला सुरुवात केली. म्हणजे विध्वंसकर्ते ते थेट निर्माते असली कोलांटउडी घेतली गेली. त्यासाठी काही पुरातत्त्वीय पुराव्यांशी छेडछाड करण्यातही त्यांनी मागेपुढे पाहिले नाही.
सिंधू संस्कृतीच्या अवशेषांत वैदिकांना प्रिय असलेल्या घोड्यांचे अवशेष मिळालेले नव्हते. त्यामुळे सिंधू संस्कृती वैदिकांचीच आहे असे ठरवायला अडचण येऊ लागल्यानंतर एन. एस. राजाराम व एन. झा या लेखकद्वयाने सिंधू संस्कृतीला घोडा माहीत होता हे दाखवण्यासाठी एका बैलाचे चिन्ह असलेल्या मुद्रेच्या छायाचित्रावर संगणकीय छेडछाड (forgery) केली व बैलाच्या प्रतिमेला चक्क घोड्यात बदलवले. हा प्रकार हार्वर्डचे इंडोलोजिस्ट मायकेल विट्झेल आणि त्यांचे सहयोगी स्टीव्ह फार्मर यांनी फ्रंटलाइनमध्ये (ऑक्टोबर २०००) लेख लिहून उजेडात आणला. आर्य वंश आणि वैदिक संस्कृती याची संघमोहिनी अचाट आहे. आता तर जनुकीय शास्त्राचा असाच उपयोग केला गेला आहे. डॉ. शिंदेंच्या वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेल्या दाव्यांवरून ते केवळ संघप्रिय सिद्धांतांचीच री ओढत आहेत हे स्पष्टच आहे. पण खुद्द ज्या शोधनिबंधांचे जे स्वत: सहलेखक आहेत ते शोधनिबंध त्याच्याच दाव्यांची पुष्टी करत नाहीत हे उघड आहे. याला आपण सांस्कृतिक राजकारण व वर्चस्वतावादासाठी शास्त्राची हत्या असेही म्हटले तर वावगे होणार नाही.
पहिली बाब अशी आहे की, कोणाच्याही जनुकांवरून त्या व्यक्तीची भाषा, अाध्यात्मिक संस्कृती समजत नाही तर तो केवळ तर्क असतो. तर्क हे वास्तव असतेच असे नाही. स्टेपेमधील भटके पशुपालक इंडो-युरोपियन भाषांचे निर्माते होते यालाच कसलाही पुरावा नाही. ऋग्वेद व पारशी धर्माचा धर्मग्रंथ अवेस्त्यात भाषा, धर्मकल्पना, देव-देवता, याज्ञिक कर्मकांड यात अतोनात साम्य आहे. एकाच भुप्रदेशात, म्हणजे इराणमध्ये या दोन्ही धर्मांची एकाच काळात निर्मिती झाली हे उघड आहे, कारण ऋग्वेदातील नोढस गौतम हा ऋषी अवेस्त्यात समकालीन म्हणून वावरतो तर खुद्द जरथुष्ट्र ऋग्वेदात वावरतो. हे लिखित पुरावे आहेत व या दोन्ही धर्मांची निर्मिती इसपू १५०० च्या मागे जावू शकत नाही, असे सर्वच (संघी सोडून) विद्वानांचे मत आहे. इसपू १५०० मध्ये सिंधू संस्कृतीचा प्राकृतिक कारणाने ऱ्हास होऊन गेला होता. त्यामुळे सिंधू संस्कृतीची निर्मिती वैदिक आर्यांची हा दावा फोल आहे, असा दावा डॉ. शिंदे सहलेखक असलेल्या शोधनिबंधांतही केला गेलेला नाही.
शोधनिबंधातील निष्कर्षांचा अर्थ असा लावता येतो की, सिंधू संस्कृतीचे निर्माते येथीलच होते. त्यांच्या जनुकप्रवाहात किमान इसपू २००० पर्यंत कसलेही बाह्य प्रादुर्भाव झालेले आढळत नाही. येथील कृषी संस्कृतीही स्वतंत्ररीत्या विकसित झाली आणि त्यातूनच सुफलनतायुक्त शैवप्रधान धर्माचा उदय झाला. इसपू २६०० मधील स्त्रीच्या सांगाड्यात ही स्टेपेची जनुके मिळून येत नाहीत. कारण तेव्हा हे लोक युरोपातून इराणमध्येही आलेले नव्हते. डेव्हिड राइश यांच्या मते त्या काळात सिंधू संस्कृतीची भाषा इंडो-इराणी पूर्व व स्वतंत्र होती. इराणी जनुकप्रवाह इसपू २००० नंतरच स्टेपेच्या जनुकांनी प्रभावित व्हायला सुरुवात झाली. स्टेपेच्या लोकांचा धर्म कोणता होता याचा अद्याप उलगडा झालेला नाही आणि ते का स्थलांतरित झाले याचे सबळ उत्तर अद्याप गवसलेले नाही. शिवाय स्टेपेतील लोक स्टेपेमध्ये जगाच्या कोणत्या भागातून आले होते हेही आपल्याला आज तरी माहीत नाही.
पण ते लोक इसपू २००० नंतर इराणमध्ये आले व स्थायिक झाले. त्यांची पुढे भारतात प्रवेशण्याची प्रक्रिया सन १५०० नंतर सुरू झाली. तोवर त्यांच्याही जनुकांत इराणी जनुकांचा संसर्ग झालेला होता. मिश्र जनुकांचे काही वैदिक धर्मीय इराणी लोक इसपू १२०० नंतर भारतात आपला धर्म घेऊन आले व धर्मप्रचाराच्या माध्यमाने काही घटकांत तो धर्म पसरवला. भारतात इराणमार्गे येणारे सर्वच वैदिक धर्मीय असू शकत नव्हते. कारण इराणमध्येच तेव्हा वैदिक, अहूर माझ्दा व वेगळ्या देवता पुजणाऱ्यांचे अनेक धर्म होते. त्यांच्यात धर्मबदल व धर्मसंघर्ष ही नित्याची बाब होती. याचे पुरावे ऋग्वेद व अवेस्त्यातच येतात. त्यातीलही काही टोळ्यांनी भारतात प्रवेश केला असणार हे उघड आहे. त्यामुळे भारतीयांत इराण-स्टेपेची जनुके आली ती केवळ वैदिक आर्यांची होती हे मतही योग्य नाही, भारतात या भागांतून स्थलांतर-आक्रमणे होण्याची परंपरा शक-कुशाण काळापर्यंत चालू असलेली आपल्याला ज्ञात इतिहासावरूनच दिसते.
खरे म्हणजे माणूस आपली पाळेमुळे शोधण्यासाठी खूप सजग असतो आणि त्यात वावगेही काही नाही. नवनव्या पुराव्यांनी आधीच्या समजुती बदलत राहतात. पण ही प्रक्रिया निकोप असावी लागते. जनुकीय शास्त्र या प्रक्रियेत मदत करणारे असले तरी ते परिपूर्ण आहे असा दावा करता कामा नये. कारण अजून पुरातन सांगाडे प्रकाशात आले व त्यांचे निष्कर्ष वेगळे निघाले तर आधीचे नि:ष्कर्ष बाद होऊन तोही शोधाचा एक टप्पा समजून पुढे जावे लागेल. शास्त्र असेच पुढे जात असते.
पुरातत्त्वविदांनी आपल्या शोधांतील निष्कर्षांशी प्रामाणिक असले पाहिजे ही अपेक्षा असते. पण डॉ. शिंदेंनी शोधनिबंधांत एक आणि जनतेला सांगायला मात्र आपली संघ अथवा कोणाच्याही मताने प्रभावित भलतेच दावे करावेत हे सर्वस्वी गैर आहे. त्यांनी अद्यापही माध्यमात प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या दाव्यांना नाकारलेले नाही किंवा ते दावे मागेही घेतलेले नाहीत यावरून शास्त्राची केवढी अप्रतिष्ठा होते आहे हे लक्षात यावे. सांस्कृतिक श्रेष्ठत्वतावादातून हा प्रकार घडत आला आहे हे उघड आहे. वाचकांनी सेल' आणि सायन्स'मधील मूळ शोधनिबंध वाचले पाहिजेत, मगच असल्या पोकळ दाव्यांवर विश्वास ठेवायचा की नाही हे ठरवले पाहिजे.
(Published in Divya Marathi, Rasik supplement)
Saturday, September 14, 2019
आर्य येथलेच?

आर्य, द्रविड, सेमेटिक, मंगोलाईड आदि वंश संकल्पना चुकीची असून सारी मानवजात होमो सेपियन या उत्क्रांत मानव प्रजातीची वंशज आहे. जे शरीर रचना, रंग आदि फरक दिसतात ते स्थानिक भूगर्भ, भूगोल आणि पर्यावरणाच्या कारणामुळे हे १९५२ सालीच युनेस्कोने सर्व मानव-अनुवांशिकी शास्त्रज्ञांच्या प्रदिर्घ चर्चेनंतर जाहीरनामा प्रसिद्ध करून स्पष्ट केले आहे. आर्य म्हणवणारे लोक इराणी होते आणि ऋग्वेद-अवेस्ता त्याचे लिखित पुरावे आहेत. आर्य हा वंश नव्हता. वैदिक धर्माने आधी स्वत:ला आर्य धर्माचे म्हणवले. नंतर आर्य या शब्दाचाही अर्थ बदलला आणि सभ्य गृहस्थ असा त्याचा अर्थ झाला तर धर्माचे नाव सनातन व नंतर वैदिक धर्म असे झाले. हा धर्म हेल्मंड खो-यातून अल्प प्रचारकांमुळे भारतात आला व मिशनरी पद्धतीने पसरवला गेला. हे धर्मांतरीत अर्थात येथीलच होते. त्यामुळे यांच्या जनुकांत लक्षणीय फरक पडणे शक्य नव्हते.
महत्वाचे म्हणजे राखीगढीतील सांगाड्यांत सापडलेल्या जनुकांचा काळ आणि वैदिक धर्म भारतात आल्याचा काळ यात किमान तेराशे वर्षांचे अंतर आहे. राखीगढीतील जनुकांत तेथील लोक एतद्देशियच होते हे सिद्ध होणे स्वाभाविक आहे. त्यावरुन "आर्य" येथीलच होते, मुलनिवासी होते असा निष्कर्श काढणे अडानीपणा आहे. आर्य हा वंश नसून धर्म होता अणि तो फार फारतर इसपू १२०० मध्ये भारतात आला. हा धर्म एतद्देशीय नाही. पण तोही एतद्देशीय ठरवण्याच्या नादात आर्य हा कोणी वंश नसुनही "आर्य येथलेच" सांगायचा प्रयत्न होतो आहे. हा म्हणजे पणतुने खापर पणजोबाला जन्माला घातले असे सांगण्यासारखे आहे. शिवाय ऋग्वेदातून समोर येणारी संस्कृती आणि सिंधू संस्कृतीत कसलेही साधर्म्य नादी तर इराणमधील अवेस्तन संस्कृतीशी आहे हे सांगायलाही डा. शिंदे विसरले.
सिंधू संस्कृती कोणत्याही आक्रमणाने नष्ट झाली नसून प्राकृतीक संकट आणि संपलेला विदेश व्यापार यामुळे लोकांनी शहरे सोडून ग्रामीण भागात वस्त्या सुरु केल्याने शहरे ओस पडली व अवशेषग्रस्त झाली हे कधीच सिद्ध झाले आहे. त्या आपत्तीकाळात (इसपू १८००) वैदिक धर्माचा जन्मही झालेला नव्हता. पण एके काळी लोकप्रिय झालेल्या आर्य आक्रमण-विस्थापन सिद्धांतामुळे मुलनिवासीवाद, द्रविदवाद जन्माला आला होता. मुलनिवासीवाद्यांना अजुनही हा सिद्धांत प्रिय आहे हेही एक वास्तव आहे. पण भौतिक लिखित पुराव्यांच्या कसोटीवर तो टिकत नाही तसेच वैदिक धर्म येथलाच हा अट्टाग्रहही टिकत नाही. वैदिक धर्मीय आज स्वत:ला हिंदू म्हणवून घेत असले तरी त्यांच्या धर्मपरंपरा अत्यंत स्वतंत्र आहेत.
डा. वसंत शिंदे यांनी जनुकांच्या आधारे आर्य येथलेच (जनुके कोणाचा धर्म/वंश/भाषा सांगत नाहीत) असा सिद्धांत ते सांगाडे ज्या काळातील आहेत तेंव्हा आर्य/सनातन/वैदिक धर्म स्थापन झालेलाही नसता मांडला आहे तो समूळ अवैज्ञानिक आणि भारतीयांची दिशाभूल करणारा आहे. ही सरकारमान्य सांस्कृतीक लबाडी आए एवढेच या संदर्भात म्हणता येते. अर्थात शिंदेंचा सिद्धांत भारतीय सोडून पाश्चात्य आनुवांशिकी अभ्यासकांना मान्य नाही हेही महत्वाचे.
Tuesday, July 30, 2019
Inclusion of Vedic religion in minorities.
To,
Mr. Syed Ghayorul Hasan Rizvi,
Chairperson,
National Commission for Minorities,
3rd Floor, Block-3,
CGO Complex, New Delhi 110 003
CGO Complex, New Delhi 110 003
Sub.: Inclusion of Vedic religion in minorities.
Ref.: National Commission for Minorities, AR 2016-17, Chapter 10.1.
Respected Sirs,
We have gone through the Annual Report, 2016-17 of the Commission, especially a part cited (10.1) regarding minority status to the Vedic Brahmins. We understand that the honorable Commission is not satisfied with the request sent by the Ministry of the Minority Affairs in this regards and thus has referred back the issue to the central Government. The report observes that the Vedic Brahmins are an integral part of the Hindu religion and expresses the concern that if the request is agreed upon other castes like Rajput, Vaishyas etc. too would also claim the similar dispensation. The Commission also seems to worry about the possible fragmentation of the Hindu religion, if the request is fulfilled.
We are of the opinion that the commission has erred in understanding the age-old religious distinction between Hinduism and Vedicism. We also do not agree with the observation that the granting minority status to the Vedics will fragment the Hindu religion because they never were part of the Hindu religion. We wish to bring following points to your notice those shall suffice to clear how Vedic religion is distinct and hence why granting minority status to the Vedic Brahmins (and also to initiated Kshatriyas and Vaishyas) is fair and just on the following grounds;
1. Vedic religion finds its source in Vedas that is explained in the Brahmanas and regulated by the Smrities whereas Hindu religion finds its source in the Agamas and Tantras. The ritualistic practices in both religion are distinct and unrelated to each other.
2. Only Vedics have the religious right of initiation in Vedic fold, reciting of the Vedas and Vedokta sanskaras. Only three Varnas, i.e. Brahmin, Kshatriya, and Vaishyas are called as twice-born, those together form the Vedic society.
3. The fact should be noted that the Brahmin is a Varna in Vedic social system and not a caste. Caste and Varna are the independent social systems of the two distinct religions. Hindus do not identify themselves with the Varna but the caste.
4. Shudra is the self-invented term by the Vedics to address all those who belonged to the distinct religious traditions. All the religious traditions that Hindu person (or so-called Shudras) follows, finds no root in the Vedas but the Tantras. The historical fact is the Shudras were prohibited from all the Vedic rituals and recitals. They had their own temples, religious scriptures better known as Agamas or Tantras and the priests even in the era of Manusmriti. (Ref. Manu. 3.152-166) Presently also most of the Hindu temples do not have Vedic Brahmin priests. Various castes have their own priests to conduct their religious ritualistic affairs. Even if the Vedic Brahmin is invited, he conducts the religious rituals based on the Tantrik (i.e. Puranokt) system and not Vedokta. Vedokta is totally denied to them. This clearly differentiates the Vedics from Hindus.
5. All those, no matter indigenous or foreign clans, no matter which faith they followed, were Shudras to the Vedics as is evidenced by Manusmriti. (Manu-10.44) Shudra originally was a name of the tribe situated at the banks of the Indus River, which was later used to address all those who did not belong to the Vedic religion.
6. In the later course, the existence of the Kshatriyas and Vaishyas was denied by the Vedic Brahmins because of the internal feuds, barring a few communities like Rajputs and some Vaishya castes as an exception.
7. The Hindu religion mostly is idolatrous and is based on the Tantras those are against the tenets of the Vedas. In fact, the idolatry is prohibited by the Vedas and only through the fire sacrifices they offer their oblations to their abstract gods.
8. Though some Vedic Brahmins are the temple priests to earn a livelihood, they add Vedic hymns in the Prayers though they are not at all meant for the gods being worshipped. The recital of Purushasukta in Hindu temples is a fine example of such malpractices. The corruption in the Hindu religion is rampant which needs to be brought to an end.
9. The Shankaracharyas, those claim to be religious heads of the Hindu religion, the fact is, they represent only the Vedic religion. Only Vedic (Twice born and expert in the Vedas and Vedic Dharmashastras) can reach to that position. No Hindu ever can become the Shankaracharya of any of the Peetha because they do not belong to the Vedic religion. This clearly shows the distinction between the two religions.
10. The demand that has comes from two Brahmin organizations clearly shows that they also are aware of their independent religious status; hence their demand is just and fair. It is necessary that their demand be obliged by the Commission. There is no question of fragmentation of the Hindu religion as the distinction between two religions in scriptures and in practice is well marked.
11. Considering Hindu and Vedic religion one and the same already is doing great harm to the Hindu religion. The social rift, such as Brahmin and non-Brahmin rivalry is age-old and still is brewing in society. Still treating the Vedic Brahmins as an integral part of the Hindu religion will be utter negligence to the socio-religious facts. Hindu religion does not find its source in the Vedas. Vedas do not uphold idolatry. No Hindu god finds mention in the Vedas. No Vedic God is worshipped by the Hindu society. There is no connection between both religions.
12. The Smritis were never intended for the Hindus as is evidenced by the socio-political history of India. Smritis were only meant to regulate the Vedic religion and not Hindu.(Ref. http://ssonawani.blogspot.in/2017/09/manusmritinot-hindu-code.html) There is no evidence to show that the Hindus ever gave any heed to the Vedic Smritis for they were never meant to regulate Hindu religion.
We, on behalf of the Hindus, humbly request the Commission that the request coming from both the Brahmin organizations be accepted as it is genuine and justified on the religious grounds. There should be no objection from the Honorable Commission in granting Vedic Brahmins the minority status they seek. Since Brahmin is a full-fledged Vedic Varna and is in minority their demand be fulfilled.
If the Commission needs a presentation with proofs in this regard, Aadim Hindu Parishad will be obliged to do so.
Thanking you,
Yours sincerely,
FOR AADIM HINDU PARISHAD,
SANJAY SONAWANI SANJAY KSHIRSAGAR
President Vice President
Monday, April 1, 2019
Vedas are not source of HInduism
In fact, it is weird that some think even after lot many archaeological proofs Vedas are the source of Hinduism. Vedic society had limited presence and that too in Magadha, Kurukshetra regions by 6th century BC. Nowhere else, even in Maharashtra traces are found of the existence of Vedic people or their religion prior to first century BC and in the south, Sangam literature proves that prior to third century AD Vedic religion was unknown to them. This only does mean that this religion gradually spread with conversions using missionary practices.
If you go through Tevijja Sutta, it will appear to you that Buddha has treated the Vedic religion as a distinct body opposed to Hindus those had several philosophical streams. Idolatry, Devotion, Salvation, Liberation was never part of Vedicism. In fact largest philosophical sect in Hinduism, that time was Sramana from which Ajeevkas, Buddism, Jainism, and many other sects sprang. Ajeevaka, Vratya were the oldest pre-vedic philosophical sects and were popular. This was the tradition of renunciation in Hinduism to which Vedas oppose. Pancharatrins promoted devotion, Yoga and Tantric rituals those were banned in Vedic rituals calling them “Vedbahya”. There were numerous Tantric sects (the foundation of Hinduism) centered around the worship of Shiva-Shakti as their chief deity. Shiva is nowhere to be found in Vedas. Common people of those times followed simple idol worship adhering to some or other sectarian ritualistic practice.
Vedics entered India sometime in 1200 BC and by sixth century BC did find some space in few states of northern India. Buddha challenges all the sects and their doctrines including Vedic as well. His mention and opposition to Vedas is as same as his opposition to Ajeevaka and Sankhya Doctrine. So this does not prove at all that the Vedas are the source of the Hinduism. This has been distinct religion and though Vedics has accepted idolatry to some extent, in Gupta era, they tried to vedicise them by creating easily detectable false myths around Hindu deities. Still, Shiva and Shakti remain non-Vedic and the scholars including Dr. RN Dandekar acknowledges this fact. There is no relation between Hindu and Vedic religion. Both have independent sources and different social order.
Vedic ritualistic practices also are too distinct the way their Gods are. Puja was never ever part of Vedicism. Had Vedas been source of the Hinduism, Vedas and Vedic gods would have remained dominant even today for entire Hindu society. But except for Vedics , none follows Vedic ritualistic practices and their Gods. It is ridiculous to consider both the religion one and the same and that Vedas are source of the Hinduism. The socio-cultural history does not support this claim!
Subscribe to: Posts (Atom)
अयोध्या: सांस्कृतीक सौहार्द का इतिहास
अयोध्या रामपूर्व जमाने से भारत देश की सांस्कृतीक राजधानी रही हैं. यहां सबसे पहले फुली फली व्ह समन संस्कृती थी जिसका आरंभ हम सिंधु संस्कृत...
- इतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...
- आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
- महाराष्ट्राचे आराध्य श्री विठ्ठल हे एक रहस्यच बनुन बसले होते. विष्णुच्या 24 अवतारांत आणि विष्णु सहस्त्रनामांतही न सापडणारा आणि तरीही एवढे ...
- Get link
- X
- Other Apps


Comments
Post a Comment